नाशिकच्या इगतपुरीला पाणीपुरवठा होणारं भावली धरण भरण्याच्या मार्गावर, नियोजनाअभावी शहरात पाण्याची चिंता

गतवर्षीपेक्षा पावसाचा आलेख उंचावला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे पुन्हा भर पावसाळ्यात महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात पाणीचिंता सुरू झाली आहे.

नाशिकच्या इगतपुरीला पाणीपुरवठा होणारं भावली धरण भरण्याच्या मार्गावर, नियोजनाअभावी शहरात पाण्याची चिंता
भावली धरण
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 4:31 PM

नाशिक: जून महिन्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने यंदा आपला मुक्काम चांगलाच लांबविला. वारंवार दिला जाणारा अतिवृष्टीचा इशारा आणि अविश्रांत कोसळणाऱ्या मुसळधारेने इगतपुरीकर हैराण झाले आहेत. मात्र असे असले तरी गतवर्षीपेक्षा पावसाचा आलेख उंचावला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे पुन्हा भर पावसाळ्यात महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात पाणीचिंता सुरू झाली आहे. पाणीकपात करण्यासाठी तत्परता दाखविणारे प्रशासन पाण्याच्या नियोजनाबाबत मात्र तत्पर नसल्याची खंतही यावेळी नागरिकांकडून व्यक्त केली जाात आहे. भावली धरण सततच्या पावसामुळं भरण्याच्या मार्गावर असून पाणीकपात कधी रद्द होणार याकडे इगतपुरीकरांचं लक्ष लागंल आहे.

स्थानिकांवर पाण्यासाठी संघर्षाची वेळ

2017 ला 2 वर्षात भावली धरणाचे पाणी इगतपुरी शहराला 24 तास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात 3 वर्षाहून जास्त कालावधी उलटून गेला तरीही अद्याप शहरात पाईप लाईनचे काम झालेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच डिसेंबर ते मार्च आठवड्यात तीन दिवस पाणी व नंतर एप्रिल ते जुलैपर्यंत आठवड्यातून दोन दिवस पाणी शहरातील नागरिकांना दिले जात आहे. त्यातही पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. दिवसाला 45 मिनिटेही पाणी पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील स्थानिकांना पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.तर सदर खणलेले खड्डे लवकर मुजवण्यात येणार असून लवकरच इगतपुरी शहराची पाणी कपात ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होणार असल्याचे प्रशासनानं सांगितलंय. भावली पाणी योजना डिसेंम्बर अखेर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यानी सांगितले. गेल्या 24 तासात तालुक्यात 55 मिलीमीमीटर पावसाची नोंद झाली असून आता पर्यंत 1623 मिली पाऊस पडला आहे.

तीन दिवसांपासून संततधार

महाराष्ट्र राज्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाने गेला एक महिना दडी मारली होती. त्यामुळे येथील नागरिक व बळीराजा चिंता ग्रस्त झाला होता. परंतु गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या भावली धरणातील पाणी साठा वाढला आहे. दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या दीड हजार दस लक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे तसेच दरम्याण दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेले भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येते. संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या भावली धरणावर आहे भावली धरण आज सकाळी 95 टक्के भरले असून असाच पाऊस सुरू राहीला तर येत्या 1 ते 2 दिवसात हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहील.

इतर बातम्या

VIDEO | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी 41 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

VIDEO: कोण म्हणालं माझे वडील गायब आहे, तर कोण म्हणालं माझी आई… तळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश

(Nashik Igatpuri Dhawali dam may full with water but Igatpuri citizens not get water sufficient)

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.