AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील अग्रगण्य कादवा साखर कारखान्यावर विकास पॅनलची विजयी गुढी; नाशिककरांनी परिवर्तन नाकारले

महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कर्मवीर कै. राजाराम सखाराम वाघ यांनी या कारखान्याची सुरुवात केलीय. या कारखान्यासाठी दिंडोरी, निफाड, नाशिक, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ऊस उपलब्ध होतो.

राज्यातील अग्रगण्य कादवा साखर कारखान्यावर विकास पॅनलची विजयी गुढी; नाशिककरांनी परिवर्तन नाकारले
कादवा कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर श्रीराम शेटे यांची मिरवणूक काढण्यात आली.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 05, 2022 | 1:45 PM
Share

नाशिकः राज्यात बहुचर्चित असणारा आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरू असणाऱ्या एकमेव अशा कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) निवडणुकीत (Election) सत्ताधारी श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. या पॅनलेच्या सर्वच्या सर्व म्हणजे एकूण 17 जागावर उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे परिवर्तन पॅनलला जोरदार धक्का बसला आहे. कादवाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीराम शेटे यांचे कादवा विकास पॅनल आणि अॅड. बाजीराव कावळे आणि सुरेश डोखळे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. एकूण 92 टक्के मतदान झाले. उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव मिळवून दिला. त्यामुळेच हा विजय झाल्याची प्रतिक्रिया कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली आहे. येणाऱ्या काळात कादवाची गाळप क्षमता चार हजारपर्यंत वाढवणे, सीएनजी प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणूक झाली चुरशीची

कादवा सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यासाठी रविवारी तीन एप्रिल रोजी मतदान झाले होते. यावेळी 12110 पैकी 11243 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी मतदानाची 92.84 टक्के नोंद झाली. कारखान्याच्या 17 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. कादवा कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांना बिगर ऊस उत्पादनकांनी निवडून दिले असून, हा धनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे सुरेश डोखळे यांनी दिली आहे.

1978 साली सुरुवात

महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कर्मवीर कै. राजाराम सखाराम वाघ यांनी या कारखान्याची सुरुवात केलीय. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1978 साली सुरू झाला. या कारखान्यासाठी कच्चा माल म्हणजेच ऊस दिंडोरी, निफाड, नाशिक, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो. सध्या कारखान्याची गाळप क्षमता ही 1250 टनावरून 2500 क्षमतेपर्यंत आहे. आगामी काळात ती 4000 टनापर्यंत नेऊ असा विश्वास विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांनी व्यक्त केलाय.

उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव मिळवून दिला. त्यामुळेच हा विजय झाला आहे. येणाऱ्या काळात कादवाची गाळप क्षमता चार हजारपर्यंत वाढवणे, सीएनजी प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे.

– श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा सहकारी साखर कारखाना

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक