अख्ख्या महाराष्ट्रात अशी रंगपंचमी नसेल; गाढवावरुन काढली जाते जावयाची मिरवणूक; ‘त्या’ पाठीमागे हे आहे कारण

रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावात अनेक वर्षापासून चालत आली आहे. यावेळी वडांगळी गावाचे जे जावई असतात त्यांची गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मंडोळ्या, गळ्यात चपलांचा हार याप्रकारे सजवून जावयाची गाढवावर बसवून सगळ्या गावातून मिरवणून काढली जाते.

अख्ख्या महाराष्ट्रात अशी रंगपंचमी नसेल; गाढवावरुन काढली जाते जावयाची मिरवणूक; 'त्या' पाठीमागे हे आहे कारण
Nashik Wadganli SinnarImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 10:48 PM

नाशिकः आपल्या देशात अनेक पद्धतीने सण समारंभ साजरे केले जातात. अनेक रूढी परंपरा इतिहासही सण समारंभामध्ये सांगितला जातो. तसेच वेगवेगळ्या गोष्टींसाठीही आपले सण समारंभ विशेष ठरतात कारण प्रदेशानुसार आणि गावानुसार विविध पद्धतीनेही सण साजरे केले जातात. अशीच एक पद्धत नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सिन्नर तालुक्यातही आहे. वडांगळी (Wadngali) गावात आगळीवेगळी असणारी ही पद्धत अनोखी ठरते ती रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढली जाते म्हणून. अख्या महाराष्ट्रात ही रंगपंचमी (Rangpanchmi) रंगतदार होते ती जावई आणि गाढवावरुन निघणाऱ्या धिंडीमुळे.

रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावात अनेक वर्षापासून चालत आली आहे. यावेळी वडांगळी गावाचे जे जावई असतात त्यांची गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मंडोळ्या, गळ्यात चपलांचा हार याप्रकारे सजवून जावयाची गाढवावर बसवून सगळ्या गावातून मिरवणून काढली जाते.

दर रंगपंचमीची ही परंपरा

गाढवावरुन मिरवणूक काढली जाते त्यापाठीमागे एक लोकपरंपरा आणि लोककथाही आहे. या पद्धतीने जर जावयाची मिरवणूक गाढवावरुन काढली तर पाऊस चांगल्या प्रकारे पडतो. त्यामुळेच या गावात कित्येक वर्षे दर रंगपंचमीला जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची परंपरा जपण्यात आली आहे.

गाढवावर बसवूनच मिरवणूक

वडांगळी गावाच्या जावयाची फक्त गाढवावर बसवूनच मिरवणूक काढली जाते असे नाही तर त्या मिरवणुकीनंतर असतो खरा मानाचा कार्यक्रम. गाढवावर बसणं ही सन्मानाची आणि गौरवाची गोष्ट मानली जात नसली तरी वडांगळी गावात मात्र गाढवावर बसून जावयाची मिरवणूक काढली तरी त्यानंतर त्याचा मानपानासह त्याचा मान राखला जातो. गाढवावरुन मिरवणूक काढून झाली की, जावायला अंघोळ घातली जाते, त्याला नवीन कपडे देऊन त्याचा मानसन्मानही ठेवला जातो, आणि चांगला पाऊस पडवा म्हणून निसर्गाकडे मागणीही केली जाते.

संबंधित बातमी

‘आगे आगे देखो होता है क्या’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा; चोराच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचाही आरोप

School : दप्तराचं ओझं होणार आणखी कमी, सर्व धडे एकाच पुस्तकात, काय आहे शिक्षण विभागाचा नवा निर्णय?

ED Raid Shridhar Patankar : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई! महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Non Stop LIVE Update
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.