AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपक्ष उमेदवाराचा प्रचार आणि थेट जिल्हा कमिटीच बरखास्त, कुणी आणि का घेतला हा निर्णय?

पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणे जिल्हा अध्यक्षांना भोवले आहे.

अपक्ष उमेदवाराचा प्रचार आणि थेट जिल्हा कमिटीच बरखास्त, कुणी आणि का घेतला हा निर्णय?
Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Jan 26, 2023 | 5:07 PM
Share

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत चढत आहे. कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार या निवडणुकीत उतरले नाहीत. मात्र, महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तर, सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार की नाही याचा निर्णय अदयाप झालेला नाही. सत्यजित तांबे हे मूळचे कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उतरले आहेत. मात्र, सत्यजित तांबे यांचा प्रचार करणे एका जिल्ह्याध्यक्षाला चांगलेच अंगलट आले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, मविआच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनी पक्षविरोधी भूमिका घेत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना १७ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवून दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते. परंतु, ७ दिवसानंतरही त्यांनी खुलासा केला नाही. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना २४ जानेवारी निलंबित करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश साळुंखे यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीच शिवाय त्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त केली आहे. याबाबत बोलताना नाना पटोले यांनी पिंपरी चिंचवड व कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. या पोटनिवडणुकीबाबत निर्णय झालेला आहे पण २ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची या विषयावर बैठक होणार आहे आणि या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय होईल, असे सांगितले.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.