AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग, गंगापूर आणि दारणा धरणातूनही विसर्ग सुरूच!

या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 80 टक्क्यांवर पोचल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग, गंगापूर आणि दारणा धरणातूनही विसर्ग सुरूच!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 10:18 AM
Share

लासलगाव : पावसाचे (Rain) माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. इगतपुरी, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील धरण क्षेत्राच्या परिसरात पावसाची थांबून थांबून रिपरिप सुरू असल्याने गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून अद्यापही पाण्याचा (Water) विसर्ग सुरू आहे. यामुळे निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नांदूर मधमेश्वर धरणातून 27 हजार 980 क्युसेक पूर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नद्यांना पूर (Flood) आलायं. तसेच या धरणातून जाकडवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आलंय.

धरणातून जायकवाडीच्या दिशेने 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग

या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 80 टक्क्यांवर पोचल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी 80 टक्क्यांवर पोहचलीयं. जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणीपुरवठा केला जातो.

गंगापूर धरणातून देखील विसर्ग सुरूच

नाशिक जिल्हात गेल्या 10 -12 दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नाशिक जिल्हातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालीयं. यामुळे जिल्हातील अनेक नद्यांना पूर देखील आला. शेतीचेही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले. नाशिक शहरामध्ये या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालायं. कारण गंगापूर धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट उभे होते. मात्र, मागच्या पावसामुळे नाशिककरांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...