AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग, गंगापूर आणि दारणा धरणातूनही विसर्ग सुरूच!

या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 80 टक्क्यांवर पोचल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग, गंगापूर आणि दारणा धरणातूनही विसर्ग सुरूच!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 10:18 AM
Share

लासलगाव : पावसाचे (Rain) माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. इगतपुरी, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील धरण क्षेत्राच्या परिसरात पावसाची थांबून थांबून रिपरिप सुरू असल्याने गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून अद्यापही पाण्याचा (Water) विसर्ग सुरू आहे. यामुळे निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नांदूर मधमेश्वर धरणातून 27 हजार 980 क्युसेक पूर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नद्यांना पूर (Flood) आलायं. तसेच या धरणातून जाकडवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आलंय.

धरणातून जायकवाडीच्या दिशेने 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग

या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 80 टक्क्यांवर पोचल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी 80 टक्क्यांवर पोहचलीयं. जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणीपुरवठा केला जातो.

गंगापूर धरणातून देखील विसर्ग सुरूच

नाशिक जिल्हात गेल्या 10 -12 दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नाशिक जिल्हातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालीयं. यामुळे जिल्हातील अनेक नद्यांना पूर देखील आला. शेतीचेही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले. नाशिक शहरामध्ये या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालायं. कारण गंगापूर धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट उभे होते. मात्र, मागच्या पावसामुळे नाशिककरांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.