AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : छोट्या भाभीची चौकशी, मोठ्या भाभीचे काय?; संजय राऊत यांचा सवाल

ठाकरे गटाचा मोर्चा अत्यंत शिस्तीत जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. संजय राऊत यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या विषयाचे राजकारण करू नये. माझ्या कार्यकाळात अनेकदा संसदेत ड्रग्सचा विषय मांडला. पण नाशिकचा विषय मांडावा लागेल असं वाटलं नव्हतं.

Sanjay Raut : छोट्या भाभीची चौकशी, मोठ्या भाभीचे काय?; संजय राऊत यांचा सवाल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2023 | 2:22 PM
Share

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 20 ऑक्टोबर 2023 : नाशिकमधील ड्रग्स रॅकेटच्या विरोधात आज ठाकरे गटाने प्रचंड मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात हजारो शिवसैनिक सामील झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. यावेळी संजय राऊत यांनी घणाघाती भाषण करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आज आम्ही मोर्चा काढलाय. उद्या वेळ आल्यास नाशिक बंद पुकारू, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

ड्रग्स विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निगालेल्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत यांनी सरकारवर आगपाखड केली. छोट्या भाभीची चौकशी सुरू आहे. मोठ्या भाभीचं काय? हा प्रश्न आहे. मोठ्या भाभीला किती हप्ता मिळत होता? 15 लाख रुपये महिन्याला ड्रग्स माफियाकडून दिले जात होते. या शहरातील आमदारांना काय हप्ता मिळत होता हे पोलीस रेकॉर्डवर आलं आहे. पालकमंत्र्यांना काय मिळत होतं, नांदगावपासून मालेगावपर्यंतचा हिशोब गृहमंत्र्यांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

रामकुंडात बुडवा, नाही तर तुडवा

नाशिकच्या ड्रग्स रॅकेटच्या मुळापर्यंत जायचं आहे. नाशिक वाचवायचं आहे. पिढी उद्ध्वस्त होताना पाहायचं नाही. शहरात ड्रग्सचा कोट्यवधीचा व्यवहार आणि व्यापार सुरू आहे. या सर्वांना रामकुंडात बुडवा. नाही तर तुडवा. माझं आव्हान आहे, या अंगावर, शिंगावर घेऊ. काय करणार आहात? अटक करता का? करा. एकदा तुरुंगात गेलो. परत जाईल. मला सांगू नका. शिवसैनिकांना धमकी देऊ नका. नाशिक ड्रग्स मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आज रस्त्यावर उतरलो. उद्या नाशिक बंद करू, असा इशाराच राऊत यांनी दिला.

शिक्षण मंत्री राजीनामा द्या

हा महासागर आहे. या मोर्चाचं एकटोक शालिमार चौकात आहे. एक इथे आहे. काल शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक काढलं. विद्यार्थ्यांनी मोर्चात जायचं नाही, असं त्यांनी फर्मावलं. हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा आहे. याचा अर्थ शिक्षण खात्याला हप्ते मिळतात का? शिक्षण मंत्री राजीनामा द्या. गृहमंत्र्यांना इशारा आहे. नाशिकच्या ड्रग्सच्या प्रश्नावर बोला. इकडची तिकडची गोष्ट सांगू नका. ही गोष्ट तुमच्या घरापर्यंत जाईल. हा साधा मोर्चा नाही. लोकांचा उद्रेक आहे, असं ते म्हणाले.

कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा

सरकारने कुत्ता गोळी खाल्लीय का? पालकमंत्री कुत्ता गोळी खावून बसलेत का? या कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा, असं राऊत म्हणाले. या मोर्चाचं हे विराट रूप पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी यायला हवं होतं. तिथे कंत्राटी भरतीवर पत्रकार परिषद घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.