AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ नेत्यांना शरद पवार यांनी फटकारले; म्हणाले, मी 56 वर्ष संसदेत आहे, मला काही तरी कळत असेल ना?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेपीसी समितीत सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व राहील. त्यामुळे न्यायाधीशांची समितीच या प्रकरणाच्या चौकशीला योग्य राहील, असं शरद पवार म्हणाले.

'त्या' नेत्यांना शरद पवार यांनी फटकारले; म्हणाले, मी 56 वर्ष संसदेत आहे, मला काही तरी कळत असेल ना?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 09, 2023 | 10:06 AM
Share

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसी मार्फत करण्याची गरज नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती पुरेशी आहे, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते शरद पवार यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण आम्ही जेपीसीवर ठाम आहोत, असं स्पष्ट केलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही जेपीसीमार्फतच अदानी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार जे बोलले ती भाजप आणि एनसीपीची स्क्रिप्ट होती, अशी टीका केली आहे. या सर्वांचा शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. जो माणूस 56 वर्ष विधीमंडळ आणि संसदेत काम करतोय, त्याला काही तरी कळत असेल ना? अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारले आहे.

शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पॉइंट असा आहे की पार्लमेंटमध्ये एखाद्या प्रश्नावर पार्लमेंटच्या सदस्यांनी काय बोलायचं यात वेगवेगळी मते असू शकतात. माझं प्रामाणिक मत आहे की चौकशी झाली पाहिजे. पण चौकशीला जेपीसी हे माध्यम योग्य नाही. का योग्य नाही? लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची जी संख्या आहे त्यावर समितीची रचना ठरते. उदाहरणार्थ जर आता 21 जणांची जेपीसी झाली तर भाजपचे 300 लोक लोकसभेत असल्याने भाजपचे 14 ते 15 लोक जेपीसीत येतील. विरोधी पक्षाचे सहाच लोक जेपीसीत असतील. एखाद्या समितीत सहा लोक कितपत प्रभावीपणे काम करतील याची शंका माझ्या मनात आहे, असं शरद पवार म्हणाले.

जेपीसीला विरोध नाही

जेपीसी समिती स्थापन झाली तर त्यात विरोधक अल्पमतात असतील. सत्ताधारी बहुमतात असतील. त्यामुळे त्याचा निर्णय काय येईल हे सांगायची गरज नाही. पण तरीही सर्व विरोधक म्हणत असतील तर जेपीसी ठेवा, तर ठेवा. त्याला माझा विरोध नाही. मला विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेतील कामाला यंदा 56 वर्ष पूर्ण होत आहे. 56 वर्ष जो माणूस विधीमंडळ किंवा पार्लमेंटमध्ये काम करतो त्याला काही तरी माहीत असेल? त्यामुळे आमची सूचना आहे की जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची चौकशी अधिक उपयुक्त ठरेल. पण तरीही काँग्रेस आणि बाकीच्या मित्रांचा जेपीसीचा आग्रह असेल तर आमचा त्याला विरोध नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

सहा ते सात जागा लढवणार

यावेळी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवरही त्यांनी मोठं भाकीत केलं. मला कर्नाटकातील जी परिस्थिती माहीत आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थितीबाबत मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. उद्याच्या निवडणुकीत भाजप पराभूत होईल. काँग्रेस सत्तेत येईल. लोकांना बदल हवा आहे. भाजपला घरी बसवून हा बदल हवा आहे, असं चित्रं आहे, असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकात आम्ही लढणार आहोत. कर्नाटकात एकूण 250जागा आहेत. त्यात पाच ठिकाणी आम्ही उमेदवार दिले तर त्याने भाजपला फायदा होईल असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. मराठी भाषिक हे आमचं मुख्य लक्ष आहे. मराठी भाषिकांना एकत्र कसं करता येईल यावर आमचं लक्ष असेल. आम्ही कर्नाटकात सहा ते सात मतदारसंघापेक्षा अधिक जागा लढवणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.