AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री भुजबळांच्या येवला मतदार संघात महाराष्ट्र बंदकडे व्यापाऱ्यांची पाठ; बाजार पेठेतील दुकाने सताड उघडी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शहरातील अनेक दुकाने उघडी आहेत.

मंत्री भुजबळांच्या येवला मतदार संघात महाराष्ट्र बंदकडे व्यापाऱ्यांची पाठ; बाजार पेठेतील दुकाने सताड उघडी
महाराष्ट्र बंदकडे मंत्री छगन भुजबळांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शहरातील दुकाने उघडी आहेत.
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 12:33 PM
Share

नाशिकः उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शहरातील अनेक दुकाने उघडी आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाले आहे. त्यासाठी त्यांनी आज सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात बंदला अल्प प्रतिसाद मिळत आहे. बाजार पेठेतील अनेक दुकाने उघडी आहेत. त्यामुळे येवल्यात तरी व्यावसायिक आणि दुकानदारांनी या बंदला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.

15 बाजार समित्यांमध्ये बंद

या बंदमध्ये आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीने सहभाग नोंदवला आहे. सोबतच जिल्ह्यातील प्रमुख पंधरा बाजार समित्याही या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीच्या बाहेर एक मोठा फलक लावून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मनमाडमध्ये दुकाने बंद

मनमाडकरांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवून महाविकास आघाडी सरकारच्या बंदमध्ये सहभाग नोंदवला. सकाळपासून बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. जवळपास शहरातील सर्व भागातील दुकाने बंद होती. त्यामुळे अनेकांची खरेदी आणि इतर व्यवहारासाठी थोडी अडचण झाली.

उद्योग आघाडीचा विरोध

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपच्या उद्योग आघाडीने विरोध केला आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. दुकान बंद करण्यास बळजबरी झाली तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून गुन्हे दाखल करू, असा इशारा पेशकर यांनी दिला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जरूर आंदोलन करावे. मात्र, आधीच कोरोनाने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दबावाखाली न ठेवता व्यापार सुरू ठेवावा, असे आवाहन पेशकार यांनी केले आहे.

शेतकरी संघटनाही दूर

लखीमपूर हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेनेही विरोध दर्शवला आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जात आहे. हे भांडण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आहे. यात शेतकऱ्यांना सुळावर दिले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी केला आहे.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण; कोरोनाच्या 783 रुग्णांवर उपचार सुरू

आई राजा उदो उदो: सप्तश्रृंगी गडावर भक्तांचा मेळा; दर्शनासाठी ‘या’ पाच ठिकाणी मिळतायत ऑनलाइन पास!

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.