मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी; दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई-आग्रा महामार्गांवर आसनगावजवळ झालेल्या ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी होऊन झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे पहाटे तीनपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यात कसलिही जीवित हानी झाली नाही.

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी; दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत
मुंबई - आग्रा महामार्गावर मालवाहतूक ट्रेलर आणि ट्रक पलटी होऊन अपघात झाला.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 9:27 AM

शैलेश पुरोहित, इगतपुरीः मुंबई-आग्रा महामार्गांवर (Mumbai-Agra highway) आसनगावजवळ झालेल्या ट्रक (Truck) आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी होऊन झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे पहाटे तीनपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यात कसलिही जीवित हानी झाली नाही. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, हॉटेल परिवारच्या समोर पहाटे 3 वाजता मालवाहतूक करणारा ट्रक हा रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन धडकला. त्यानंतर तो महामार्गावर येऊन पलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. तसेच चेरपोली गावाजवळ एक मालवाहतूक ट्रेलर (trailer) पलटी झाला. या दोन्ही अपघातात जीवित हानी झाली नाही, परंतु मुंबईकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून ठप्प आहे. त्याचा वाहन चालकांना तसेच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे पोल काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

दोन दिवसांत अपघात…

मुंबई-नाशिक महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कंटेनरने उभ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेला हा दुसरा अपघात आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एक तर चालक अतिवेगात वाहने चालवतात किंवा अनेकांनी मद्यप्राशन केलेले असते. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि असे अपघात होतायत.

तर अपघात टळतील

कुठेही होणारे बहुतांश अपघात सहज टाळता येतात. मात्र, त्यासाठी चालकाने वेगावर नियंत्रण ठेवायला हवे. वेग मर्यादेत असेल, तर प्रवास सहज आणि सुकर होतो. शिवाय आपण कोणाच्या मृत्यूला वा जखमी होण्याला कारणीभूत होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने सजग रहायला हवे. शक्य तितके अपघात टाळायला हवेत.

दुचाकी अपघात वाढले

नाशिक जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.