AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नार्वेकर लबाडला सांगा, हिंमत असेल तर इकडे…’, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना ललकारले

"जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इकडे येऊन बोल मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कुणाची? बंद दाराआड तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी दिल्याच नाही सांगतो, त्याचे पुरावे दिले आहेत", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्षांना ललकारलं आहे.

'नार्वेकर लबाडला सांगा, हिंमत असेल तर इकडे...', उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना ललकारले
| Updated on: Jan 23, 2024 | 8:54 PM
Share

नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या सभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही निशाणा साधला. राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला. यावेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेची 2013 ची घटना दुरुस्ती मिळालीच नाही, असा दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2013 च्या पक्षाच्या प्रतिनिधीसभेचा व्हिडीओच प्रसारमाध्यमांसमोर दाखवला होता. या प्रतिनिधीसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील बघायला मिळाले होते. याच मुद्द्याचा धागा पकडत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ललकारलं.

“जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इकडे येऊन बोल मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कुणाची? बंद दाराआड तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी दिल्याच नाही सांगतो, त्याचे पुरावे दिले आहेत. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही. २०१३ साली हेच गृहस्थ उभे होते बिल्ला घालून”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांवर केला.

“जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत पाया पडले होते. तुमचे आशीर्वाद ही शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही. मित्रांना मान नाही. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले असं म्हणत असतील तर २०१४ साली शिवसेनेशी युती का तोडली होती? एकनाथ खडसे नाशिमध्येच सांगितलं आहे, २०१४ मेपर्यंत आ गले लग जा. मला दिल्लीत बोलावलं होतं. राष्ट्रपतींच्या पत्रावर सही करायला. तोपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी होती. नंतर जुन ते ऑक्टोबर असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडली. आजही ती व्यक्ती जिवंत आहे. भाजपमधील ती जबाबदार व्यक्ती आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता?

“भाजपने २०१४ मध्ये युती तोडली. शिवसेनेने कुणाच्याही मदतीशिवाय ६३ आमदार निवडून आले. हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्षनेते होते. तेव्हा ती व्यक्ती आली आणि म्हणाली, उद्धव मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हटलं का? तर म्हणाले, दिल्लीत अशी चर्चा होती. आता बाळासाहेब राहिले नाही (बघा किती हरामी लोकं आहेत) त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे. २०१४मध्ये दिल्लीत असा विचार सुरू होता आता बाळासाहेब राहिले नाही. उद्धव ठाकरे काही करू शकत नाही आणि शिवसैनिक उद्धव सोबत जाणार नाहीत. आता वेळ आलीय शिवसेनेला संपवायचा”, असं ठाकरे म्हणाले.

“शिवसेनेचे पाच किंवा १० सीट येतील. पण तू कमाल केली. तू ६३ जागा आल्या. दिल्ली तुला आता घाबरतेय. २०१४साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं. काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता. राम एकवचनी होते. सत्यवचनी होते. मी आईवडिलांची शपथ घेऊन सांगितलं अमित शाह यांनी वचन मोडलं. नाही पाळलं त्यांनी. वचन मोडूनही तुम्ही स्वतला रामभक्त समजता. वचन मोडलं नसतं तर आज फडणवीस अर्धा नव्हे पाव मुख्यमंत्री झालेत आता ते अडीच वर्ष पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. काय फरक पडला असता. तुम्ही जी फोडाफोडी केली. आज ही ताकद तुमच्यासोबत राहिली असती. आज तुम्हाला वारंवार महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती. तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.