AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon : मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा

कोट्यावधी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांचा निधीतून उभारण्यात आलेल्या या उद्यानांची आज बकाल अवस्था झाली आहे.

Malegaon : मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा
उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 5:41 PM
Share

नाशिक : कामगार वस्तीचे शहर असलेल्या मालेगाव शहराच्या (Malegaon City) सुंदरतेत भर पडावी यासाठी शासनाच्या अमृत योजनेतून तब्बल 5 कोटी रुपयांच्या निधीतून उद्यान विकसित करण्यात आले होते. यामुळे शहराच्या सुंदरतेत काही प्रमाणात भर पडली होती. या उद्यानात नागरिकांची वर्दळ देखील वाढली होती. मनपाच्या (Malegaon Municipal Corporation)दुर्लक्षामुळे आताच्या परिस्थितीत उद्यानांची (Garden) मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रोपे आणि लावलेली झाडे करपली असून उद्याने अखेरची घटका मोजत आहेत. मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कोटींचा निधी वाया गेल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या तिथल्या उद्यानाची अवस्था एखाद्या क्रिकेटच्या मैदानासारखी झाली आहे, त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार

कोट्यावधी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांचा निधीतून उभारण्यात आलेल्या या उद्यानांची आज बकाल अवस्था झाली आहे. ही सर्व उद्याने मालेगाव शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात विकसित करण्यात आली होती. गाजावाजा करून तयार करण्यात आलेल्या या उद्यानात लावण्यात आलेली रोपे चांगली वाढली होती. याठिकाणी लहान बालकांसह जेष्ठ नागरिक देखील विरंगुळासाठी गर्दी करीत होते. परंतु मनपा आणि उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे आज ते कोट्यवधीचे उद्याने बकाल झालीत. उद्यान विभागाने देखभाल करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सर्व उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे. याठिकाणी लावण्यात आलेली रोपे करपली आहेत. जी रोपे मोठी झाली होती ती वाळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सरपणासाठी तोडून नेली आहेत.

शहराला पुन्हा विद्रुपीकरण आले

मात्र यामुळे शहराला पुन्हा विद्रुपीकरण आले आहे. उद्यानासाठी खर्च केलेला कोट्यवधी रुपयांचा निधीचा चुराडा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्याची मालेगाव शहरातील उद्यानाची अवस्था एखाद्या क्रिकेटच्या मैदानासारखी झाली आहे. उद्यानाची देखभाल न केल्याने अशी अवस्था झाली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...