AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon : मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा

कोट्यावधी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांचा निधीतून उभारण्यात आलेल्या या उद्यानांची आज बकाल अवस्था झाली आहे.

Malegaon : मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा
उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 5:41 PM
Share

नाशिक : कामगार वस्तीचे शहर असलेल्या मालेगाव शहराच्या (Malegaon City) सुंदरतेत भर पडावी यासाठी शासनाच्या अमृत योजनेतून तब्बल 5 कोटी रुपयांच्या निधीतून उद्यान विकसित करण्यात आले होते. यामुळे शहराच्या सुंदरतेत काही प्रमाणात भर पडली होती. या उद्यानात नागरिकांची वर्दळ देखील वाढली होती. मनपाच्या (Malegaon Municipal Corporation)दुर्लक्षामुळे आताच्या परिस्थितीत उद्यानांची (Garden) मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रोपे आणि लावलेली झाडे करपली असून उद्याने अखेरची घटका मोजत आहेत. मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कोटींचा निधी वाया गेल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या तिथल्या उद्यानाची अवस्था एखाद्या क्रिकेटच्या मैदानासारखी झाली आहे, त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार

कोट्यावधी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांचा निधीतून उभारण्यात आलेल्या या उद्यानांची आज बकाल अवस्था झाली आहे. ही सर्व उद्याने मालेगाव शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात विकसित करण्यात आली होती. गाजावाजा करून तयार करण्यात आलेल्या या उद्यानात लावण्यात आलेली रोपे चांगली वाढली होती. याठिकाणी लहान बालकांसह जेष्ठ नागरिक देखील विरंगुळासाठी गर्दी करीत होते. परंतु मनपा आणि उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे आज ते कोट्यवधीचे उद्याने बकाल झालीत. उद्यान विभागाने देखभाल करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सर्व उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे. याठिकाणी लावण्यात आलेली रोपे करपली आहेत. जी रोपे मोठी झाली होती ती वाळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सरपणासाठी तोडून नेली आहेत.

शहराला पुन्हा विद्रुपीकरण आले

मात्र यामुळे शहराला पुन्हा विद्रुपीकरण आले आहे. उद्यानासाठी खर्च केलेला कोट्यवधी रुपयांचा निधीचा चुराडा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्याची मालेगाव शहरातील उद्यानाची अवस्था एखाद्या क्रिकेटच्या मैदानासारखी झाली आहे. उद्यानाची देखभाल न केल्याने अशी अवस्था झाली आहे.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.