AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याने बोलावे आंबेडकर आमचे बाप आहेत म्हणून मग…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

आम्ही निवडणूक आयोगाला जी माहिती मागत आहोत ती माहिती निवडणूक आयोग देत नाही आहे. त्यामुळे निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे की कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत हा प्रश्न आहे. जे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत घडलं तेच दिल्ली विधानसभेत घडतं आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

'त्याने बोलावे आंबेडकर आमचे बाप आहेत म्हणून मग...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
| Updated on: Feb 10, 2025 | 6:40 PM
Share

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी महापुरुषांवर वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेवरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब यांच्याबद्दलही वादग्रस्त विधाने करीत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाज यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते यावेळी म्हणाले की हे बोलण्याची हिंमत कुठून करत आहेत? आपण तर त्याला उधड धमकी दिली आहे तो जिथे कुठे असेल त्याला मारणार म्हणून…आम्ही संविधान मानणारी माणस आहोत पण जर त्याने पातळी आत्ता ओलांडली आहे…त्याने बोलाव ना आंबेडकर हे आमचे बाप आहेत म्हणून आम्ही त्याला सोडून टाकू..पण यांच्या डोक्यात मनुवाद आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कधी अंडा फुटेल हे सांगता येत नाही अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच आहे, जर तुम्ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी असे एकीकडे तुम्ही बोलत आहात, दुसरीकडे सुर्यवंशी प्रकरणात पोलिसांना वाचवा म्हणत आहात. त्यामुळे दोन्ही हत्येमधील आरोपींना ही फाशी झालीच पाहिजे. असे कुणाला माफ करता येत नाही . मग तर जेलमधील हत्येमधील सर्व आरोपींना सोडलं पाहिजे मग असे मुख्यमंत्र्यांना सांगा असा सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे. सुरेश धस या प्रकरणात राजकारण करत आहेत. मग या न्यायाने वाल्मिक कराड याला सुद्धा सोडलं पाहिजे का? असाही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहेत.

राज ठाकरे आणि फडणवीस भेट

राज ठाकरे यांचं बोलण लोकांना अपिल होत त्यामुळे त्यांनी आत्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली होती त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री गेले असतील राज यांच्या भेटीला असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाला शह देणं आता काही गरज उरली आहे का?असा प्रश्न आहे या निकालामुळे निर्माण झाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद्र नार्वेकर आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आहेत. यावर आव्हाड यांना विचारले असता त्यांनी, मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. आपल्या कामाकरीता त्यामुळे कोणी भेटल तर त्यात गैर नाही असे सांगितले.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.