AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती देखील दि.बा. पाटील (D.B.Patil) यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी आक्रमक झाली आहे.

दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार
कृती समितीची बैठक
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 8:36 PM
Share

नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) नाव देण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्य सरकारनं नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवला आहे. तर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती देखील दि.बा. पाटील (D.B.Patil) यांच्या नावासाठी आक्रमक झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने पनवेलमध्ये बैठक घेतली. दि.बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. (Navi mumbai international airport action committee protest at CIDCO office for demand of D B Patil name gave to airport )

सिडकोला घेराव, लाखभर आंदोलक जमवण्याचा निर्धार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने सिडकोला घेराव घालण्याच्या आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. त्या आंदोलनात किमान एक लाख व्यक्तींद्वारे घेराव घालण्यात येईल, अशी तयारी कृती समितीकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगले करता येत नसेल तर वाईट गोष्टी करू नये, असं म्हटलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा सल्ला वजा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची आज पनेवलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली. बैठकीला दशरथ पाटील, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, संजीव नाईक, महेश बालदी, दशरथ भगत यांच्यासह असंख्य नेते उपस्थित होते. विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी जोरदार लढा सुरू आहे. 24 जूनच्या घेराव आंदोलनात भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, स्थानिक, कृती समिती, संस्था संघटना, विविध राजकीय पक्षाचे गाव ते शहरातील किमान 01 लाख जणांचा समावेश असणार आहे.

दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात 1984 साली राज्यव्यापी शेतकरी आंदोलन

1984 साली दिबांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई गावी, शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली अशा शेतकरी आंदोलनात पाच शेतकर्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या आंदोलनातून प्रस्थापित झालेले साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचे तत्त्व पुढे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. नवी मुंबईच्या विकासासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर जनतेच्या प्रश्नांसाठी दिबांनी संबंध आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळे त्यांच्या या कर्मभूमीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करणे, ही येथील सर्व जनतेची रास्त मागणी आहे, असे दशरथ पाटील यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा, रामदास आठवलेंची घोषणा

Navi mumbai international airport action committee protest at CIDCO office for demand of D B Patil name gave to airport

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.