AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai | सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे

वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंत पथदिव्यांच्या देखभालीची जबाबदारी यावी यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबरला दोन्ही प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त पाहणीही करण्यात आली होती. बांधकाम विभागाने हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखविला आहे.

Navi Mumbai | सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे
सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 10, 2021 | 5:56 PM
Share

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे हस्तांतर केली आहे. हस्तांतरित करण्यापूर्वी दुरुस्तीसाठी 8 कोटी 29 लाख रुपये निधी मनपाला देण्यात आला आहे. महामार्गावरील 4 भुयारी मार्गांच्या देखभालीची जबाबदारीही मनपाकडे देण्यात आली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या रस्त्यांमध्ये सायन-पनवेल महामार्गाचा समावेश आहे.

शासनाने जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. पण दिवाबत्ती व भुयारी मार्गांच्या देखभालीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने महामार्गाची निळा झाकळू लागली होती. शिवाय अंधारामुळे महामार्गावर नियमित अपघात होत असतात. भुयारी मार्ग सुरु नसल्यामुळेही पादचाऱ्यांची गैरसोय होत असते. मोठ्या जिकरीचे रस्ता ओलांडावा लागत आहे. महामार्ग देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्यामुळे त्याच्या देखभालीसाठी मनपाला खर्च करता येत नव्हता. महामार्गाची योग्य देखभाल होत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाच्या कामगिरीवरही परिणाम होऊ लागला होता. यामुळे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली होती.

चार भुयारी मार्गाची जबाबदारीही मनपाकडे

या मागणीची दखल जबाबदारी घेण्याची तयारी केली होती. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. शासनस्तरावर अनेक बैठकाही घेण्यात आल्या होत्या. वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंत पथदिव्यांच्या देखभालीची जबाबदारी यावी यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबरला दोन्ही प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त पाहणीही करण्यात आली होती. बांधकाम विभागाने हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखविला आहे. वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंतचे पथदिवे ट्रान्सफॉर्मर विद्युत यंत्रणा, विद्युत मीटर महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्या आहेत. यापूर्वी दुरुस्तीकरीता लागणारे अंदाजपत्रक बांधकाम विभागाला दिले होते. विद्युत विभागाने पडताळणी करून मनपाला 8 कोटी 29 लाख रुपये दिले आहेत. याशिवाय चार भुयारी मार्गाची जबाबदारीही मनपाकडे दिली आहे.

लवकरच भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुले होणार

महामार्गावरील नेरुळमधील दोन पादचारी भुयारी मार्ग, एसबीआय कॉलनीसह चार पादचारी भुयारी मार्गाच्या देखभालीची जबाबदारीही मनपाने घेतली आहे. त्याठिकाणी असलेल्या गैरसोयीची सुविधा देखील महापालिका करणार आहे. यामुळे लवकरच भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुले होऊ शकणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सायन -पनवेल महामार्गावरील पथदिव्याचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागला आहे. यापुढे महामार्ग कायमस्वरूपी प्रकाशमान राहणार आहे. (Navi Mumbai Municipal Corporation is responsible for the maintenance of street lights on Sion-Panvel Highway)

इतर बातम्या

Sharad Pawar: वाढदिवसाला भेटायला येऊ नका, शरद पवार ‘व्हर्च्युअल रॅली’तून शुभेच्छा स्वीकारणार, जयंत पाटील यांची माहिती

Omicron : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर BMC ॲलर्ट, अवघ्या 9 रुपयात अँटिजेन टेस्ट किट, अर्ध्या तासात अहवाल

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..