AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“डॉ. आंबेडकरांचा वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकरची पात्रता नाही”, काँग्रेस नेत्याची जहरी टीका

नवी मुंबई विमानतळाचा वाद थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. आता पनवेलचे काँग्रेस नेते अभिजीत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीय.

डॉ. आंबेडकरांचा वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकरची पात्रता नाही, काँग्रेस नेत्याची जहरी टीका
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 11, 2021 | 7:15 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाचा वाद थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. आता पनवेलचे काँग्रेस नेते अभिजीत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीय. “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काही एक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांवर राजकारणात उभा राहिला,” असा आरोप अभिजीत पाटील यांनी केलाय. आंबेडकरांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केल्यानंतर ही टीका करण्यात आलीय. पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत आंबेडकरांवर शाब्दिक हल्ला चढवलाय (Panvel Congress leader criticize Prakash Ambedkar over Navi Mumbai Airport name).

पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले, “दि. बा. पाटील आणि नवी मुंबई विमानतळ याच्याशी प्रकाश आंबेडकर यांचा काही एक संबंध नाही. नवी मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला काडीचे स्थान नाही. नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय आहे.”

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काहीएक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांबर राजकारणात उभा राहिला आणि नंतर खाल्ल्या पानात थुंकून दुसऱ्याच्या वळचणीला गेला. राजकारणातला त्यांचा वावर हा सुपारी घेतल्यासारखाच आहे ही एक बाब आहे. आपला काही संबंध नाही अशा गोष्टीत नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय त्यांना आहे,” अशी जहरी टीका पाटील यांनी केली.

“… तर मी प्रकाश आंबेडकरांचा दास होईन”

अभिजीत पाटील म्हणाले, “नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की दि. बा. पाटील यांचं, याच्याशी वास्तविक प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सुतराम संबंध नाही. नवी मुंबईत त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला काडीचं स्थान नाही. इथल्या लोकभावना, इथल्या अस्मिता, इथले आर्थिक प्रश्न, याबाबत प्रकाश आंबेडकरांना चार परिच्छेदांचा निबंध कुणाशी चर्चा न करता लिहून दाखवला तर मी त्यांचा दास होईन. दि. बा. पाटील यांच्याबद्दलही त्यांना काही माहिती असेल अथवा आस्था असेल अशातलाही भाग नाही. पण खूप दिवसांत पेपरात नाव आलं नाही आणि महाविकास आघाडी सरकारला विरोध करणं हा सध्या एकमेव व्यवसाय असल्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे नावाला विरोध करत ‘संघ’प्रणित भाजपच्या हातात हात मिळवलाय.”

“संविधानापेक्षा वैयक्तिक रागलोभ प्रकाश आंबेडकरांना जास्त महत्त्वाचे”

“2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करून आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडून भाजपला अशीच अप्रत्यक्ष मदत केली होती. 4 वर्षांपूर्वी तमाम विरोधी पक्षांनी मुंबईत “संविधान बचाव” मोर्चा काढला तेव्हा हे घटनाकारांचे वारस कसला तरी फडतुस प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करुन त्यापासून दूर राहिले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानापेक्षा आपले वैयक्तिक रागलोभ प्रकाश आंबेडकरांना जास्त महत्त्वाचे वाटले होते,” असाही आरोप पाटील यांनी केला.

अभिजीत पाटील म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि दि. बा. पाटील आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. नव्या मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दिबांनी आपली हयात घालवली. राजकीय पदांची कधी पर्वा केली नाही. प्रकाश आंबेडकरांनी दिबांच्या संघर्षात कधी वाटा उचलल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. तिथे झपाट्याने कॉस्मॉपॉलिटन होत असलेल्या मुंबईत बाळासाहेबांनी मराठी अस्मिता धगधगत ठेवली. गरीब घरात जन्मलेले, गल्लीबोळात वाढलेले असंख्य बहुजन तरुण त्यांनी राजकारण आणले आणि एक अख्खी पिढी घडवली. शाहू, फुले, आंबेडकरांनंतर एक आगळं सोशल इंजिनिअरिंग कुणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरे यांनी. या दोघांचीही महती इतकी मोठी आहे की विमनतळाला नाव दिल्याने किंवा न दिल्याने, ती वाढणार नाही की कमी होणार नाही. या दोघांच्या नखाचीही सर प्रकाश आंबेडकरांना नाही.”

“हे बाळासाहेब आणि ते बाळासाहेब यात अमाप फरक”

“विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं यावरुन मतभेद निर्माण झालेले दिसले, तिथे तापल्या तव्यावर आपली पोळी भाजायला हे पुढे आलेत. दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततामय मार्गाने यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे. पण आगीत तेल ओतायला आलेल्या प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना मात्र थारा देऊ नये. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्त आणि बाहेरून आलेले लोक यांच्यात आता कुठे सुसंवाद प्रस्थापित होतोय. विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बिघडता कामा नये. ‘नावात काय आहे?’, असं शेक्सपिअर म्हणून गेला. पण हे बाळासाहेब आणि ते बाळासाहेब यात अमाप फरक आहे. ते बाळासाहेब झकास पाईप ओढायचे. सुपारी खायचे नाहीत,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

डोक्यावर पाऊस, हातात झेंडे, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा, पुढचं आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार

व्हिडीओ पाहा : 

Panvel Congress leader criticize Prakash Ambedkar over Navi Mumbai Airport name

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!