AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत, पनवेल महापालिकेच्या कराबाबत नगर विकास मंत्री आठवड्याभरात निर्णय घेणार

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील विविध विषयांवर चर्चाही केली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच पनवेल महानगरपालिकेचा अवाजवी कर याबाबत चर्चा केली.

प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत, पनवेल महापालिकेच्या कराबाबत नगर विकास मंत्री आठवड्याभरात निर्णय घेणार
Eknath Shinde In Navi Mumbai
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 1:52 PM
Share

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील विविध विषयांवर चर्चाही केली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच पनवेल महानगरपालिकेचा अवाजवी कर याबाबत चर्चा केली.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच प्रकल्पग्रस्त बांधवांची गरजेपोटी असलेली घर कायम करण्यासंदर्भात तसेच पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करा संदर्भात नेत्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार आणि दि. बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शेकापक्षाचे नेते आणि आमदार बाळाराम पाटील, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिष घरत, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत हे सर्व या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच पनवेल महानगरपालिकेचा अवाजवी कर याबाबत आपण याच आठवड्यात एक बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्‍वासन या शिष्टमंडळाला दिले.

नगर विकास मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे गेले कित्येक वर्ष खितपत पडलेला प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न आता निकालात निघण्याची आशा बळावली आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनाही दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या :

भर पावसातही नवी मुंबईत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, स्वच्छतेवर भर देण्याचा संकल्प

कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारीला गती द्या, नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.