Navi Mumbai : आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद, तर उद्या नागपुरात पाणीबाणी!

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांचा पाणीपुरवठा आज संध्याकाळपर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे.

Navi Mumbai : आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद, तर उद्या नागपुरात पाणीबाणी!
नवी मुंबई पालिकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 10:03 AM

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) आज काही तांत्रिक दुरूस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद (Water supply cut) राहणार आहे. मोरबे धरण (Morbe Dam) ते दिघा मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व दुरुस्तीचं काम तातडीने करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेच्या पाणी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागात पुर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांचा पाणीपुरवठा आज संध्याकाळपर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील कामोठे, खारघर नोडमधील नवी मुंबई महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठादेखील बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबईतील नागरिकांनी गरजे एवढा पाणीसाठा करावा असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पालिकेस सहाकार्य करावे असं पालिकेनं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या नागपुरात पाणीबाणी!

उद्या नागपुरातील आठ जलकुंभाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गोधनी पेंच -4, जल शुद्धीकरण केंद्र तीन तास बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा पाणी पुरवठा दुरूस्तीच्या कारणास्तव घेण्यात आला आहे. त्यामुळे आठ जल कुंभावर होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे.

Non Stop LIVE Update
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.