AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच भडाभडा बोलल्या, प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर

अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला होता. त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना झाला. बच्चू कडू यांच्याबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच भडाभडा बोलल्या, प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर
नवनीत राणा आणि रवी राणा
| Updated on: Jun 13, 2024 | 10:13 PM
Share

माजी खासदार नवनीत राणा यांनी आज अखेर माध्यमांसमोर येत सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रीया दिली. नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर उभ्या होत्या. पण तिथे त्यांचा पराभव झाला. त्यांनी आपल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. “मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केले त्यानंतर मला कळले नाही की यंदा जनतेने मला का थांबवले?”, असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांना विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उभं राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “राज्यात काम करायचे की कुठे हे ठरविले नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आपण दिल्लीला गेला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी नवनीत राणा यांना विचारलं. त्यावर त्यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शपथ होती. मी भाजपची कार्यकर्ता आहे. त्यामुळे दिल्लीत जाणे काहीही गैर नाही. यापूर्वीही पाच वर्ष दिल्लीत होती. पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत. कारण आमचे मोदी पंतप्रधान झाले आहेत”, अशी भूमिका मांडली. “मोदी एकटे लढले, त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोकं झुंड बनवून त्यांना रोखत होते”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

नवनीत राणा यांचा बच्चू कडू यांना टोला

अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला होता. त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना झाला. बच्चू कडू यांच्याबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोकं दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात”, असं नवनीत राणा म्हणाल्या. “अमरावती आमच्या नेत्यांना माहित आहे की काय घडले. आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना सांगायची गरज नाही”, असंदेखील नवनीत राणा म्हणाल्या.

‘तर मी एससी आणि एसटीचे समाजासोबात उभी राहीन’

“एससी आणि एसटीचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले जाणार असेल, तर मी एससी आणि एसटीचे समाजासोबात उभी राहीन”, असं नवनीत राणा म्हणाल्या. “एससी आणि एसटी समाजातील लोकांना उद्देशून खोट्या स्वरूपात संविधान बदलले जाईल असा प्रचार केला. लवकरच एससी आणि एसटी समाजाला या खोट्या प्रचाराची जाणीव होईल”, असा दावा नवनीत राणा यांनी केला.

नवनीत राणा यांची ठाकरेंवर टीका

नवनीत राणा यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “उद्धव ठाकरे यांचा पोपट बोलत होता की आम्ही शपथ घेऊ आणि मोदींना निमंत्रित करू. पण सर्वांनी पाहिले मोदींनी शपथ घेतली. शेर आखिर शेर ही होता है. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मी पराभूत झाली म्हणून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.