AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार’, जयंत पाटलांच्या विधानानं हास्यकल्लोळ

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकऱ्यांनी जयंत पाटलांना समोर अनेक समस्या सांगितल्या. काही प्रश्नांवर जयंत पाटलांनी लगोलग तोडगा काढला. पण माकडाच्या संदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर मात्र जयंत पाटलांनी असं उत्तर दिलंय.

Video : 'माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार', जयंत पाटलांच्या विधानानं हास्यकल्लोळ
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 28, 2022 | 5:19 PM
Share

सांगली : सध्या हनुमान हा विषय राज्यभर चर्चेत आहे. त्यामुळे त्यावर बोलताना सगळेच जपून बोलत आहेत. सर्वसामान्यांपासून ते समाजकारणी, राजकारणी सगळीच मंडळी या प्रकरणावर बोलताना विचारपूर्वक विधान करत आहेत. अचूक टायमिंग साधत करेक्ट कार्यक्रम करणारे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी (Jayant Patil) सध्या माकड आणि हनुमानावर कमेंट केली आहे. ‘माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या विधावनंतर एकच हश्या पिकला. ते सांगलीत बोलत होते. याचा व्हीडिओ सध्या चर्चेत (Viral Video) आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटलांनी सध्या माकड आणि हनुमानावर कमेंट केली आहे. माकड हे हनुमानाचा अवतार आहे. आपण त्यांना काय करणार… आता आपण हनुमान चालिसा म्हणतोय आणि त्या माकडांचा काय बंदोबस्त करणार, असं म्हणत जयंत पाटलांनी हनुमान चालिसा प्रकरणावर भाष्य केलंय. त्यांच्या या विधावनंतर एकच हश्या पिकला.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्यांने आमच्या भागात माकडांचा त्रास असल्याचं जयंत पाटलांना सांगितलं. तुमच्या भागात झाडं जास्त आहेत. तरी इकडे माकडांचा त्रास नाही. पण आमच्या भागात मात्र आम्हाला खूप माकडांचा त्रास होतोय. यावर काहीतरी योजना करा, असं या शेतकऱ्याने सांगितलं. तेव्हा माकड हनुमानाचा अवतार असल्याने आपण त्यांना काही करू शकत नाही, असं जयंत पाटील उपरोधाने म्हणाले. जयंत पाटलांच्या बोलण्याचा मतितार्थ समोर बसलेल्या लोकांच्या लक्षात आला आणि त्यांना हसू आवरलं नाही. अन् तिथं हास्याचे फवारे उडाले. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकऱ्यांनी जयंत पाटलांना समोर अनेक समस्या सांगितल्या. काही प्रश्नांवर जयंत पाटलांनी लगोलग तोडगा काढला. पण माकडाच्या संदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर मात्र जयंत पाटलांनी असं हटके उत्तर दिलंय.

Follow Us
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?