AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या पत्रावर शरद पवारांनी बोलणं टाळलं पण, गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मी काय केलं हे स्पष्ट सांगितलं

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. तसे राज ठाकरेंनी भूमिका घेतली असेल तर त्यावर हरकत घेण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

राज ठाकरेंच्या पत्रावर शरद पवारांनी बोलणं टाळलं पण, गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मी काय केलं हे स्पष्ट सांगितलं
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 16, 2022 | 6:44 PM
Share

मुंबई : राज्यातील अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपने या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाजप नेत्यांना पत्र लिहून बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले आहे. त्याच पत्रावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फारसं मत व्यक्त न करता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मत मांडले असेल तर चांगले आहे म्हणत अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन राजकीय पक्षांना केलं आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणाऱ्या कालावधीचा विचार करता निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मत शरद पवार यांनी मांडले आहे.

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. तसे राज ठाकरेंनी भूमिका घेतली असेल तर त्यावर हरकत घेण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती, त्यावेळी मी स्वतः त्यांच्या घरातील कुणी उमेदवार असेल तर मी उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते.

रमेश लटके यांनी महानगरपालिका, विधिमंडळातील योगदान आणि उरलेला कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेही मत पवारांनी मांडले आहे.

अंधेरी पूर्वची पोट निवडणूक प्रतिष्ठेची न करता महाराष्ट्रात चांगला मेसेज जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन करत शरद पवारांनी महत्वाची भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे यांनी देखील राजकारण करत असतांना ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्या व्यक्तीच्या घरातील कुणी उभे राहत असेल तर बिनविरोध निवडून द्यावे हीच खरी त्या व्यक्तीला श्रद्धांजली असेल असे मत मांडले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.