AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या पत्रावर शरद पवारांनी बोलणं टाळलं पण, गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मी काय केलं हे स्पष्ट सांगितलं

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. तसे राज ठाकरेंनी भूमिका घेतली असेल तर त्यावर हरकत घेण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

राज ठाकरेंच्या पत्रावर शरद पवारांनी बोलणं टाळलं पण, गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मी काय केलं हे स्पष्ट सांगितलं
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 16, 2022 | 6:44 PM
Share

मुंबई : राज्यातील अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपने या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाजप नेत्यांना पत्र लिहून बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले आहे. त्याच पत्रावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फारसं मत व्यक्त न करता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मत मांडले असेल तर चांगले आहे म्हणत अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन राजकीय पक्षांना केलं आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणाऱ्या कालावधीचा विचार करता निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मत शरद पवार यांनी मांडले आहे.

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. तसे राज ठाकरेंनी भूमिका घेतली असेल तर त्यावर हरकत घेण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती, त्यावेळी मी स्वतः त्यांच्या घरातील कुणी उमेदवार असेल तर मी उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते.

रमेश लटके यांनी महानगरपालिका, विधिमंडळातील योगदान आणि उरलेला कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेही मत पवारांनी मांडले आहे.

अंधेरी पूर्वची पोट निवडणूक प्रतिष्ठेची न करता महाराष्ट्रात चांगला मेसेज जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन करत शरद पवारांनी महत्वाची भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे यांनी देखील राजकारण करत असतांना ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्या व्यक्तीच्या घरातील कुणी उभे राहत असेल तर बिनविरोध निवडून द्यावे हीच खरी त्या व्यक्तीला श्रद्धांजली असेल असे मत मांडले आहे.

Follow Us
इम्तियाज जलील यांनी निदा खानला घर देण्यासाठी... नाशिक धर्मांतरण
इम्तियाज जलील यांनी निदा खानला घर देण्यासाठी... नाशिक धर्मांतरण.
डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय.....
डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय......
न्यायव्यवस्थेला वाळवी लागले, न्यायालयांवर दबाव आहे; राऊतांचा हल्लाबोल
न्यायव्यवस्थेला वाळवी लागले, न्यायालयांवर दबाव आहे; राऊतांचा हल्लाबोल.
शेतकऱ्याच्या पदरात पुन्हा निराशाच... अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...
शेतकऱ्याच्या पदरात पुन्हा निराशाच... अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे....
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक.
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा.
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग....
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग.....
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM..
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM...
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?.
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास.