AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राष्ट्रपती राजवट लागू होणार’ ; ‘या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचा नेता ठाम कारण…

बंडखोर आमदारांविषयी सांगताना त्यांनी कर्नाटक निवडणुकीविषयीही बोलताना त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्याच्या निवडणूक लढण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेणार आहेत.

'राष्ट्रपती राजवट लागू होणार' ; 'या' वक्तव्यावर राष्ट्रवादीचा नेता ठाम कारण...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 30, 2023 | 9:59 PM
Share

सांगली : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारविषयी विरोधकांकडून सातत्याने सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्याविषयावरूनही जोरदार राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी हे सरकार येत्या काही दिवसात कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली होती. शिंदे-फडणवीस सरकार कोसळल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यावर सत्ताधारी गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.

आमदार जयंत पाटील यांनी हे शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशीही त्यांनी शक्यता वर्तवली होती.

त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार एक महिन्यात कोसळणार, दोन महिन्यात कोसळणार अशा फक्त वल्गना केल्या जात आहे.

मात्र हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. तरीही जयंत पाटील यांनी हे सरकार कोसळणार आणि राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या आपल्या मतावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपात्रता झाली तर बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच परततील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री जयंत पाटील ठाम आहेत. कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल लागल्यावर आपात्रता होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार आहे. त्यामुळे त्यानंतर भाजपा नेतृत्वाला दुसरा पर्यायच उरणार नसल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

बंडखोर आमदारांविषयी सांगताना त्यांनी कर्नाटक निवडणुकीविषयीही बोलताना त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्याच्या निवडणूक लढण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेणार आहेत.

निर्णय घेण्याचा आपल्याला काय अधिकार नाही आपण एक छोटा कार्यकर्ता असल्याची प्रतिक्रियाही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

Follow Us
'शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
'शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?