AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांसाठी अर्जाची गरज नाही, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

बांधकाम मजुरांना अर्थसहाय्यासाठी कोणताही अर्ज किंवा कागदपत्रांची आवश्यकता नाही, असं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Financial help to Construction worker).

बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांसाठी अर्जाची गरज नाही, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 23, 2020 | 7:21 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरु आहे. या कालावधीत राज्य सरकारने रोजगार बुडालेल्या इमारत आणि इतर बांधकाम मजुरांनात प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पैसे थेट कामगारांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Financial help to Construction worker). तसेच कामगारांना कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

संबंधित 2 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी अर्ज किंवा कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणत्याही संघटना, संस्था अथवा व्यक्ती यांच्याकडून कामगारांना भूलथापा देऊन कागदपत्रांची मागणी होत असल्यास त्यांनी कामगार विभागाकडे किंवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कामगारांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा कामगार कल्याण मंडळाने दिला आहे.

जिल्हा कार्यालय स्तरावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बांधकाम कामगारांना थेट (DBT) पध्दतीने  रकमेचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी संबंधित कामगारांची जिल्हा कार्यालयाकडून मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात नोंद होणं आवश्यक आहे. बांधकाम कामगारांची यादी व बँकेचा तपशील मंडळस्तरावर मागवून अर्थसहाय्य वाटप करण्यात येत आहे. तसेच त्यास मंडळाच्या मुख्यालय स्तरावरुन 20 एप्रिल 2020 पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंगम्  यांनी दिली.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान ज्वेलर्ससमोर खड्डा खणला, खुदाई करत करत भुयार बनवून ज्वेलर्स लुटलं

तळीरामांना धीर निघेना, सांगलीत वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास

कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र कोरोना लॅब, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ‘सीड मदर’ राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

Financial help to Construction worker

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?