AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलासादायक ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.76 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.64 टक्क्यांवर आला आहे.

दिलासादायक ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट
| Updated on: Oct 10, 2020 | 11:41 PM
Share

मुंबई : राज्यात शनिवरी (10 ऑक्टोबर) कोरोनासंदर्भात दिलासा देणारी आकडेवारी (number of covid patients in Maharashtra) समोर आली आहे. शनिवारी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 11 हजार 416 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 हजार 440 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.76 टक्के आहे. तर शनिवारी दिवसभरात राज्यात 308 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्याचा मृत्यूदर हा 2.64 टक्क्यांवर आला आहे. (number of cured patients in Maharashtra is double than that of new corona virus cases)

राज्यात आतापआर्यंत 15 लाख नागरिकांना कोरोना

सध्या राज्यात 2 लाख 21 हजार 156 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 75 लाख 69 हजार 447 नमुन्यांपैकी 15 लाख 17 हजार 434 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलेल्या नमुन्यांपैकी पॅझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण 20 टक्के आहे. राज्यात सध्या 22 लाख  68 हजार 57 संशयित होम क्वारंटाईनआहेत. तर 24 हजार 994 नागरिकांना  संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय. राज्यात शनिवारी 308 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्युदर 2.64 टक्के एवढा आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अनलॉकनंतर नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण 1 लाख 92 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 9391 वर पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या कोरोना रुग्णांपेक्षा जास्त असली तरी, मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील बरीच आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य प्रशासनाला ठाणे, मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखणे अजूनही आव्हानात्मकच असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर

डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस घेऊन भारतात आले, संजय राऊत यांचा दावा

कोरोना व्हायरसची चेन तुटण्यास सुरुवात, लॉकडाऊनमुळं नेमका किती फायदा?

(number of cured patients in Maharashtra is double than that of new corona virus cases)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.