मनोज जरांगे यांना प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का लागते? थेट सवाल, ओबीसी नेत्याने..
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा समाजाने अनेक जिल्हांमध्ये बंदची हाक दिली आहे. काल प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला पोहोचले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. ते भावनिक साद घालताना दिसले होते.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. राज्यात राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी भाजपा नेते प्रसाद लाड अंतरावली सराटीत गेले होते. मात्र, जरांगे यांनी पाणी पिण्यास होकार दिला पण उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज राज्यातील अनेक जिल्हांमध्ये बंद पुकारण्यात आला. कडकडीत बंद पाळला जातोय. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा बांधवांकडून आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके परवानगी नसतानाही मुंबईकडे निघाले आहेत.
हाके यांच्या मोर्चाला परवानगी नसतानाही ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. हाके यांना जरांगेंच्या आंदोलनाबद्दल विचारले असताना त्यांनी म्हटले की, त्यांचे ते उपोषण आणि उपोषणाला लाल गोधडीच का लागते? यामागचे उपोषण आणि उपोषणामागचे उपोषण… जे डिफेंडर गाडीमधून फिरू शकतो, असं म्हणतो.. तो उपोषण काय प्रामाणिकपणे करणार…
प्रश्नच नाही.. शासनाकडे रिपोर्ट आहेत, ब्लड रिपोर्ट आहेत. अधिकाऱ्यांचा दावा आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांचा. उपोषण करणाऱ्या माणसाच्या ब्ल़ड टेस्ट, युरीन टेस्ट कशा येतात… त्यातून सर्व दिसते ना ग्लुकोस वगैरे. त्यामुळे एकदा नक्कीच चाैकशी झाली पाहिजे. त्या लाल गोधडीत नक्की काय दडलंय का? मनोज जरांगे पाटील उपोषणाला बदनाम करत आहेत.
मनोज जरांगे पाटील हे पहिल्या दिवसापासून लाल गोधडी घेऊन उपोषण करतात. पहिल्या दिवसापासून त्यांची तीच गोधडी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातून लोकांना अगोदरच आवाहन केले की, हळूहळू करून सर्वांनी मुंबईकडे जावे. झेंडे न लावता जा म्हणजे पोलिसांना संशय येणार नाही. कोणीही आझाद मैदानाकडे जाऊ नका. मी पण 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत येतो, असे त्यांनी म्हटले.
