AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा

राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) थकवली आहे, एफआरपीचे तुकडे केले आहेत. ते साखर कारखाने बंद पाडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा
| Updated on: Nov 02, 2020 | 9:01 PM
Share

कोल्हापूर : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) थकवली आहे, एफआरपीचे तुकडे केले आहेत. ते साखर कारखाने बंद पाडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (on FRP issue Raju Shetty slams sugar factory owner said will not allow to open sugar factory)

“स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरात 19 व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानीने वेगवेगळे ठराव संमत केले. ऊस परिषदेनंतर राजू शेट्टी यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले “ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी द्यायला उशीर केला. तसेच एफआरपी टप्प्याटप्प्यात दिली किंवा थकवली, त्यांच्या विरोधात मी औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ज्यांनी एफआरपी द्यायला 14 दिवसांपेक्षा जास्त उशीर केला, त्यांच्याकडून 15 टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी आम्ही साखर आयुक्तांना करणार आहोत.” तसेच ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची एफआरपी थकवली ते साखर कारखाने आम्ही बंद पाडणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कृषी कायद्यांविरोधात 5 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन

दरम्यान, देशात लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना राजू शेट्टी यांना विरोध दर्शविला आहे. त्यांनी येत्या 5 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार असून महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील असे सांगितले. तसेच राज्याचे शेतकरी देशातील शेतकऱ्यांसोबत असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात येईल असे ते म्हणाले.  हे चक्काजाम आंदेलन 2 तासांचे असून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार उतरुन कृषी कायद्यांना विरोध दर्शवणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात झाला होता.

संबंधित बातम्या :

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

(on FRP issue Raju Shetty slams sugar factory owner said will not allow to open sugar factory)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली