AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

onion and tomato | कांदा शेतकऱ्यांना तर टोमॅटो ग्राहकांना रडवणार

onion and tomato price | विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. या फायनल मॅचसाठी जय्यत तयारी सुरु आहे. हा सामना पाहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

onion and tomato | कांदा शेतकऱ्यांना तर टोमॅटो ग्राहकांना रडवणार
tomato and onionImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 17, 2023 | 11:57 AM
Share

उमेश पारीक, लासलगाव, नाशिक | 17 नोव्हेंबर 2023 : कधी ग्राहकांना तर कधी शेतकऱ्यांना रडवणारे पीक म्हणजे कांदा आणि टोमॅटो. आता कांदा आणि टोमॅटो पुन्हा रडवणार आहे. कांदा पिकामुळे शेतकरी बेजार झाला आहे. चांगले उत्पन्न आल्यानंतर सरकारचे धोरण आणि व्यापाऱ्यांची एकाधिकारशाहीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचवेळी टोमॅटोमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. टोमॅटोचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. मुंबईतील वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोला ४५ रुपये किलो दर मिळत आहे. यामुळे किरकोळ बाजारात 65 ते 75 रुपये प्रतिकिलोपर्यंत टोमॅटो पोहोचला आहे. कांदा आणि टोमॅटो पिकाने पुन्हा एकदा वांदा केला आहे.

लासलगावमध्ये पुन्हा लिलाव बंद

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे ओळख आहे. परंतु या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. लासलगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार आवारात गेल्या ऑगस्ट महिन्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे कांदा लिलाव बंद ठेवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय शोधावे लागत आहे.

लासलगावमुळे विंचूर बाजार समितीचा फायदा

लासलगाव बाजार समितीत वारंवार कांदा लिलाव बंद ठेवला जात आहे. परंतु उपबाजार विंचूर येथील कांदा बाजार सुरु आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांत लासलगाव मुख्य कांदा आवारापेक्षाही विंचूरमध्ये जास्त कांदा येत आहे. या ठिकाणी लासलगावपेक्षा 1 लाख 14 हजार क्विंटलने अधिक कांद्याचे लिलाव झाला आहे. विंचूर बाजार समितीच्या कांदा लिलावात ही ऐतिहासिक नोंद आहे.

विंचूरने घेतली आघाडी

लासलगाव येथे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि 13 नोव्हेंबरपर्यंत कांदा व्यापाऱ्यांनी अनेक दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवले. परंतु विंचूर येथे या दिवसांत कांदा व्यापारी आणि कामगार यांनी कांदा लिलावात सातत्य ठेवले. यामुळे शेतकरी लासलगाव ऐवजी विंचूर बाजारात कांदा विक्रीसाठी आणत आहे. या बाजार समितीत 8 लाख 11 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. आता येणाऱ्या दिवसांत अधिक कांद्याचे लिलाव करुन ही आघाडी कायम ठेवली जाईल, असे लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.

Follow Us
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
मोठी बातमी! शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा