AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Worker : पालघरमध्ये बहाडोली येथे 13 कामगार वैतरणा नदीत अडकले, पावसामुळे बचाव कार्यात अडथळा

दीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्नही अपयशी ठरले. त्यामुळे आता फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Palghar Worker : पालघरमध्ये बहाडोली येथे 13 कामगार वैतरणा नदीत अडकले, पावसामुळे बचाव कार्यात अडथळा
पालघरमध्ये बहाडोली येथे 13 कामगार वैतरणा नदीत अडकलेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 10:22 PM
Share

पालघर : बहाडोली येथे कामासाठी गेलेले 13 कामगार वैतरणा नदी (Vaitarana River)त फसले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली. यामुळे हे कामगार (Worker) नदीतच अडकले (Stuck) आहेत. एनडीआरएफची टीमने घटनास्थळी दाखल होत कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला आहे आणि रात्र झाल्यामुळे एनडीआरएफचे प्रयत्न अयशस्वी ठरले. यामुळे राज्य शासनाकडे मदत मागण्यात आली असून, या कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते याकडे लक्ष लागले आहे.

नदीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्न अयशस्वी

मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे महामार्गाचे काम वैतरणा नदीत सुरू आहे. याच कामासाठी हे 13 कामगार नदीत गेले होते. मात्र जिल्ह्यासह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बहाडोली येथे काम करणारे 13 कामगार नदीत फसले. ह्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ ह्यांनी कोस्ट गार्डकडे फसलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी एअर लिफ्टची मदत मागितली. मात्र अशा धोकादायक वातावरणात एअर लिफ्ट शक्य नसल्याने कोस्ट गार्डने मदत करण्यास नकार दिल्याचे कळते. त्यानंतर एनडीआरएफला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र नदीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्नही अपयशी ठरले. त्यामुळे आता फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते याकडे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला असून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. (13 workers got stuck in the Vaitarna river at Bahadoli in Palghar)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.