AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परतीच्या पावसात 25 हजार क्विंटल मिरची भिजली, व्यापाऱ्यांचे इतक्या कोटीचं नुकसान

आताच्या हंगामात आतापर्यंत 25 हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली.

परतीच्या पावसात 25 हजार क्विंटल मिरची भिजली, व्यापाऱ्यांचे इतक्या कोटीचं नुकसान
व्यापाऱ्यांचे इतक्या कोटीचं नुकसान Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 19, 2022 | 4:44 PM
Share

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत पंचवीस हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली. ही मिरची वाळविण्यासाठी मिरची पठारांवर टाकली जाते. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे वीस हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची पावसाच्या पाण्यात सापडली. दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. असं बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आताच्या हंगामात आतापर्यंत 25 हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली. मिरची वाढवण्यासाठी पठारांवर टाकण्यात आली होती. मिरची वाढण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागतो.

मात्र रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे मिरची पावसात भिजून व्यापाऱ्यांचे जवळपास 30 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास दोन ते अडीच कोटीच्या घरात नुकसान असल्याचा अंदाज नंदुरबार बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी व्यक्त केला आहे.

परतीच्या पावसामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आजही परतीचा पाऊस झाला. व्यापाऱ्यांचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक सुरू झाली. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली होती. मात्र अचानक झालेल्या पावसाने व्यापाऱ्यांना मोठा फटका दिल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे.

मिरची हे महत्त्वाचं पीक आहे. पण, मिरची गेल्यामुळं तिखट महागण्याची चिन्हं आहेत. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. ही भरपाई कशी करायची, असा प्रश्न आता व्यापाऱ्यांना पडला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.