AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha flood : सिरोंच्यातील 34 गावांना महापुराचा फटका, 95 गावांमध्ये 7 दिवसांपासून वीज नाही, नागरिकांचा आक्रोश

नागपूरच्या इतवारी भागातील पुरातन हनुमान मंदिर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Vidarbha flood : सिरोंच्यातील 34 गावांना महापुराचा फटका, 95 गावांमध्ये 7 दिवसांपासून वीज नाही, नागरिकांचा आक्रोश
घरात पाणी शिरल्याने बाहेर काढलेले साहित्य.Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 6:40 PM
Share

गडचिरोली : जिल्ह्यातील पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. मेडीगट्टा धरणामुळे व प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली सिरोंचा (Sironcha) तालुक्यातील 34 गावांमध्ये महापुराचा फटका (flood water) बसला. पुरामुळे नागरिक अस्ताव्यस्त झाले आहेत. गंभीर पूरपरिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. नगराम येथील स्वस्त धान्य दुकानात पुराचे पाणी शिरल्याने जवळपास 70 बॅग तांदूळ भिजला. सिरोंचा तालुक्यातील 95 गावांमध्ये सात दिवसांपासून विद्युत सेवा खंडित (villages without electricity) झाली आहे. या विद्युत सेवेबाबत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केलाय. काही नागरिकांच्या सामान रस्त्यावर ठेवण्यात आला. काही नागरिकांच्या घरात पुराने पाणी शिरल्याने घराचे सामान सडले आहे.

अकोल्यात पूर्णा नदीत युवक वाहून गेला

अकोला जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अमरावती जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी हे गांधीग्राम येथील पूर्णा नदीत आले. पाण्याची पातळी वाढली असल्याने पाणी पाहण्यासाठी युवक गेले. ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अकोला शहरातल्या दुर्गा चौक येथील 27 वर्षीय सुधीरसिंग सोहेल हा युवक रात्री 7 वाजताच्या सुमारास वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता सुधीरसिंग आढळला नाही. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून त्याचा शोध सुरू केला आहे.

नागपुरातील हनुमान मंदिर कोसळले

नागपूरच्या इतवारी भागातील पुरातन हनुमान मंदिर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सततच्या पावसाने जुन्या आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जुन्या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला.

चंद्रपुरात पुराचा 20 हजार 65 शेतकऱ्यांना फटका

चंद्रपूर गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल 17 हजार 652 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापसाचे पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पाऊस थांबल्याने कृषी विभागाने सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली आहे. पुराचा 20 हजार 65 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Follow Us
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....