AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचे किती आमदार नाराज?; बावनकुळेंनी आकडाच सांगितला

महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे.

महाविकास आघाडीचे किती आमदार नाराज?; बावनकुळेंनी आकडाच सांगितला
ओबीसी आरक्षणासाठीचा नवा कायदा ही सरकारची नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 3:53 PM
Share

शिर्डी: महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे. त्याचा फटका बसू नये म्हणूनच सरकारला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात बदल करावे लागले, असा दावा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे आज साई दरबारी आले होते. साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यसरकारला कायदा आणण्याची गरज का पडली..? गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही..? जवळपास 50 ते 60 सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज आहेत. 16 महिने मुख्यमंत्री भेटत नसतील… त्यांची कामे होत नसतील तर काय होणार? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

राज्यपाल चुकीचं पत्रं देणार नाहीत

यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रावरही भाष्य केलं. राज्यपाल चुकीचं पत्र सरकारला देणार नाहीत. या सरकारमध्ये खरच धमक असेल तर गुप्त मतदान घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असे आव्हानच बावनकुळे यांनी सरकारला दिलं.

ऊर्जा मंत्र्यांना प्रशिक्षणाची गरज

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. राज्याच्या ऊर्जा मंत्र्याला प्रशिक्षणाची गरज आहे. तसं असेल तर मी त्यांना एक दिवसाचं प्रशिक्षण द्यायला तयार आहे. फडणवीस सरकारने 28 हजार कोटींची वीज दिली होती. ही वीज देताना एकही कनेक्शन कापल गेलं नाही. भाजप सरकार जाताना तिन्ही वीज कंपन्या नफ्यात होत्या, असं सांगतानाच पुन्हा भाजप सरकार आलं तर पाच वर्षे वीज न कापता शेतकऱ्यांना वीज देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

सरकारचा दोन वर्ष टाइमपास

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरलं. सर्वोच्च न्यायालयाचे दोन वर्षात दोनदा आदेश आलेत. दोन वर्षे यांनी टाईमपास केला. काही लोकांना या जागा बळकावून धनदांडग्यांना देण्याची तयारी केलीय. आधीचा डेटा तयार करण्यासाठी निधी का दिला नाही?, असा सवाल त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य

ST Strike|विलीनीकरण नसेल, तर मरण द्या; नाशिकमधील 269 एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

VIDEO: अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी आमदारांना फटकारले

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.