AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात एका झटक्यात 5 गैरसमज दूर होतील, कसं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ जेतेपदासाठी लढत देणार आहे. असं असताना या सामन्याबाबत बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागताच पाच गैरसमज दूर होतील.

IND vs NZ Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात एका झटक्यात 5 गैरसमज दूर होतील, कसं ते जाणून घ्या
IND vs NZ Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात एका झटक्यात 5 गैरसमज दूर होतील, कसं ते जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 07, 2026 | 3:28 PM
Share

India vs New Zealand, Final: आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा संघ कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आता आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लढत होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण न्यूझीलंड संघाने कायम टीम इंडियाचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे धाकधूक असणं सहाजिकच आहे. गेल्या काही वर्षांपासून या सामन्याबाबत गैरसमज प्रचलित झाले आहेत. आता टीम इंडियाकडे एक चांगली संधी चालून आली आहे. भारतीय संघ एका विजयासह पाच गैरसमज दूर करू शकतो. पण आता प्रश्न असा आहे की हे पाच गैरसमज आहेत तरी काय? टी20 वर्ल्डकप आणि न्यूझीलंडच्या सामन्याच्या आकडेवारीशी संबंध काय? भारतीय संघाची सध्याची ताकद पाहता न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढू शकते. चला जाणून घेऊयात एक एक करून..

पहिला गैरसमज: गतविजेत्या संघाने जेतेपद मिळवलं नाही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं हे दहावं पर्व आहे. आतापर्यंत नऊ पर्व झाली असून कोणत्याही गतविजेत्या संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे दहाव्या पर्वात इतिहास बदलण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. भारताने 2024 टी20 वर्ल्डकपचं जेतेपद मिळवलं होतं. आता 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं तर हा गैरसमज दूर होईल.

दुसरा गैरसमज: यजमान संघ जेतेपद जिंकलेला नाही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आणखी एक गैरसमज प्रचलित आहे. यजमानपद असलेला संघ कधीही जेतेपदाची चव चाखू शकलेला नाही. 2026 स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे आणि अंतिम फेरीही गाठली आहे. आता न्यूझीलंडला पराभूत करताच हा गैरसमज दूर होईल.

तिसरा गैरसमज : अहमदाबादमध्ये आयसीसी जेतेपद मिळवलेलं नाही

तिसरा सर्वात मोठा गैरसमज असा आहे की, अहमदाबादमध्ये भारताने आयसीसी चषक जिंकलेला नाही. या मैदानात एकमेव आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. आता टीम इंडियाने हा सामना जिंकला तर हा गैरसमज दूर होईल

चौथा गैरसमज : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ भारी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड हे संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. तिन्ही वेळेस न्यूझीलंडने भारताला धोबीपछाड दिलेला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात हा गैरसमज दूर करण्याची संधी आहे. यासाठी भारताने न्यूझीलंडला धोबीपछाड देणं आवश्यक आहे.

पाचवा गैरसमज: भारत समोर असेल तर न्यूझीलंड चॅम्पियन

आता पाचवा गैरसमज हा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीशी निगडीत आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आयसीसी स्पर्धेतील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत आमनेसामने आले आहे. दोन्ही स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ वरचढ ठरला आहे. 2000 साली न्यूझीलंडने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. तर 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत असं घडलं.

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.