AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar News : पावसात ट्रेकिंग करणे महागात पडले, हरिश्चंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा गारठून मृत्यू

भर पावसात चढाईस कठिण असलेल्या हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगला जाणे सहा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.

Ahmednagar News : पावसात ट्रेकिंग करणे महागात पडले, हरिश्चंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा गारठून मृत्यू
हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकाचा थंडीने मृ्त्यूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 04, 2023 | 1:39 PM
Share

अहमदनगर / 4 ऑगस्ट 2023 : ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्र गडावर गेलेल्या एका पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडली. बाळू नाथाराम गिते असे मयत पर्यटकाचे नाव आहे. तर अन्य तिघांचीही प्रकृती खालावली. गावकरी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू केले. तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. रस्ता भरकटल्याने ते जंगलात अडकले होते. यादरम्यान थंडीमुळे गारठल्याने एकाचा मृत्यू झाला. भरपावसात नको ते धाडस करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. बाळू गिते याचा मृतेदह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी राजूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल सांगळे हे करीत आहेत.

पुण्याहून सहा मित्र ट्रेकिंगला आले होते

पुण्याहून सहा मित्र हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगला गेले होते. या सहा जणांनी 1 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तोलार खिंडीतून गड चढायला सुरवात केली. मात्र सध्या गडावर प्रचंड धुके असल्याने पर्यटक रस्ता भरकटले. यामुळे या तरुणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला. भर पावसात ते जंगलात अडकले होते. यावेळी थंडी आणि पावसामुळे चौघांची प्रकृती बिघडली. यापैकी बाळू गिते याची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि त्याचा तेथेच मृत्यू झाला.

अन्य तिघांची प्रकृती स्थिर

बाळू नाथाराम गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तीपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे अशी सहा जणांची नावे असून, सर्व पुण्यातील कोहगाव येथील रहिवासी आहेत. एका तरुणाने आरडाओरडा केल्याने सदर घटना उघड झाली. मुंबईतील एका ग्रुपने गाईड बाळू रेंगडे यांस याबाबत माहिती दिली. यानंतर बाळू रेंगडे यांनी तात्काळ गडावर धाव घेतली. तसेच तोलारखिंड तपासणी नाक्यावरील वन संरक्षक, राजूर पोलीस, वनविभाग आणि गावकऱ्यांनाही रेंगडे यांनी माहिती दिली. यानंतर सर्वांनी गडावर दाखल होत त्यांनी तरुणांना रेस्क्यू केले. तर मयताचा मृतदेहही खाली आणला. अन्य तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.