AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस निरीक्षकामुळे अवैध दारु विक्रेत्याचे हृदय परिवर्तन, मद्यविक्री सोडून चहाचं हॉटेल सुरु

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बाळासाहेब माने यांना पोलीस ठाण्यात बोलावले. 'तुम्ही अवैध धंदे करू नका' अशी वेळोवेळी समज दिली. चांगला सन्मानजनक व्यवसाय करा मी आवश्यकतेनुसार तुम्हाला मदत करेन, असे आश्वासनही यादवांनी मानेंना दिले होते.

पोलीस निरीक्षकामुळे अवैध दारु विक्रेत्याचे हृदय परिवर्तन, मद्यविक्री सोडून चहाचं हॉटेल सुरु
अहमदनगरमध्ये अवैध दारु विक्री सोडून चहाचे हॉटेल
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 01, 2021 | 11:20 AM
Share

अहमदनगर : अहमदनगरमधील कर्जतच्या पोलीस निरीक्षकामुळे एक दारु विक्रेत्याचे मत परिवर्तन झाले. त्याने दारु विक्री सोडून चक्क चहाचे हॉटेल सुरु केले. ‘तुम्ही अवैध धंदे करु नका’ अशी वेळोवेळी दिलेली समज बाळासाहेब माने यांचे हृदय परिवर्तन करणारी ठरली.

अहमदनगरला कर्जतच्या पोलीस निरीक्षकामुळे एका दारु विक्रेत्याचे मन परिवर्तन झाले. त्यामुळे त्याने दारु विक्री सोडून चक्क चहाचे हॉटेल सुरु केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही किमया केली आहे. कर्जत शहरातील बाळासाहेब माने हे अवैध दारु विक्री करत होते. त्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी वारंवार कारवाया करण्यात आल्या होत्या.

चंद्रशेखर यादव यांच्याकडून समज

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माने यांना पोलीस ठाण्यात बोलावले. ‘तुम्ही अवैध धंदे करू नका’ अशी वेळोवेळी समज दिली. चांगला सन्मानजनक व्यवसाय करा मी आवश्यकतेनुसार तुम्हाला मदत करेन, असे आश्वासनही यादवांनी मानेंना दिले होते.

श्री साई कृपा नावाने चहाचे हॉटेल

चंद्रशेखर यादव यांची ही तळमळ दारु विक्रीचा व्यवसाय करणारे बाळासाहेब माने यांचे मनपरिवर्तन करणारी ठरली. त्यांनी भांडेवाडी येथे करमाळा रस्त्यालगत श्री साई कृपा नावाने चहाचे हॉटेल सुरू केले. या हॉटेलला स्वतः यादव यांनी भेट देत माने यांचे कौतुक केले आहे.

रक्षाबंधनाला बहिणींकडून भावाचा दारुचा गुत्ता उद्ध्वस्त

दरम्यान, गावातील अवैध दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुलेही दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दोघी बहिणींनी गावातील अवैध दारू बंद करायची, असा निश्चय केला. दोन्ही बहिणींनी एकत्र येऊन भाऊ प्रकाश चव्हाण यांचा दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला. गेल्या वर्षी बुलडाण्यात ही घटना समोर आली होती.

संबंधित बातम्या :

रक्षाबंधनादिवशी रणरागिणीचे रुप, बहिणींकडून भावाचा अवैध दारुचा व्यवसाय उद्ध्वस्त

गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन, भरवला दारुविक्रीचा बाजार!

(Ahmednagar Police Inspector appeals Illegal liquor seller to stop business later opens Tea Hotel)

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?