AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्या वारकऱ्यांनी दोन डोस घेतले असतील, त्यांनाच पंढरपुरात प्रवेश द्या”

पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

ज्या वारकऱ्यांनी दोन डोस घेतले असतील, त्यांनाच पंढरपुरात प्रवेश द्या
Sadhana Bhosale Pandharpur
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 11:34 AM
Share

पंढरपूर : येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी (Ashadi Ekadashi 2021) पंढरपूरला (Pandharpur) जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही वारकरी पायी वारीचा आग्रह धरत आहेत. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाईल, असं नगराध्यक्षा साधना भोसले (Sadhana Bhosale Pandharpur) यांनी सांगितले. (Ashadi Ekadashi 2021 Only those who took two doses of covid 19 can entered in Pandharpur said Nagaradhyaksha Sadhana Bhosale)

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी आषाढी वारी रद्द झाली होती. यंदाही या वारीवर कोरोनाचे सावट आहे. पालखी मार्गावर येणाऱ्या अनेक गावांनीदेखील पायी वारीला विरोध केला आहे. सगळ्यात शेवटचं गाव असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क पायीवारी काढल्यास वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करणार असल्याचा इशारा दिला आहे.

पंढरपुरात कोरोनाचा उद्रेक 

यानंतर आता पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, ज्या वारकऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, अशाच वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा. पंढरपूरमध्ये सध्या 555 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. 24 हजार 731 जणांना आजपर्यंत संसर्ग झालेला आहे. तर 480 जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. यामुळे अद्यापही नागरिकांत कोरोनाबद्दल भीती आहे.

पालख्यांचा मुक्काम 

पंढरपुरातील अनेक महत्वाच्या मठात कोव्हिड केअर सेंटर सुरू आहेत. गेल्यावर्षी 3 दिवसात पालख्यांचा मुक्काम पंढरपुरात संपला होता. पण यंदा 6 दिवस पालख्या पंढरपुरात असणार आहेत. त्यामुळे अनेक भाविक दर्शनास येण्याची भीती आहे. पंढरपूरमधील कोरोनाचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. आता शासन याबद्दल काय निर्णय घेईल याकडे लक्ष असणार आहे.

दहा पालख्यांना परवानगी

राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसापूर्वी दिली होती.

संबंधित बातम्या  

मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

(Ashadi Ekadashi 2021 Only those who took two doses of covid 19 can entered in Pandharpur said Nagaradhyaksha Sadhana Bhosale)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.