AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची सत्ता किती राज्यात? ताकद घटलीय? शरद पवार यांनी आकडाच सांगत केलं मोठं विधान

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पवार यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

भाजपची सत्ता किती राज्यात? ताकद घटलीय? शरद पवार यांनी आकडाच सांगत केलं मोठं विधान
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 07, 2023 | 1:34 PM
Share

पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार आज सोलापुरात आले. सोलापुरात एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पंढरपुरात आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचं किती राज्यात अस्तित्व आहे याचा आकडाच सांगितला. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काय घडेल याचं भाकीतही त्यांनी केलं.

हरयाणात भाजप नाही, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. संपूर्ण देशाचा नकाशा पुढे ठेवला तर फक्त पाच ते सहा राज्यात भाजप आहे. बाकी सर्व ठिकाणी नॉन भाजप आहे. देशभरात भाजपची घसरण सुरू आहे. आता लोकसभेत काय होईल हे सांगू शकणार नाही. पण लोकसभा आणि विधानसभा एकत्र होईल का? याचा निकाल आज सांगता येत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

कर्नाटकात काँग्रेसच

कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही. काँग्रेसची सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला. सुप्रिया सुळेंना सात वेळा संसदपटू पुरस्कार दिला आहे. आता हे आठवी वेळ आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सुप्रिया सुळे यांच्यावर इतर कोणताही जबाबदारी देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एका वर्षात लोकसभेची निवडणूक आहे. तोपर्यंत आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही. फक्त मतदारांची जबाबदारी घेऊ असं सुप्रिया सुळे यांनीच सांगितलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पोरासोरांवर मी काय बोलावं?

संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं. सीरिअस बोलण्यासाठी ज्यांचा लौकीक आहे. त्यावर मी बोललं पाहिजे. त्याबद्दल मला विचारा. पोरासोरांच्या विधानावर मी काय बोलावं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

सरकारचं धोरण योग्य नाही

सरकार शेतकऱ्यांसोबत असतं तर शेतकऱ्याची ही अवस्था झाली नसती. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगली किंमत आहे. पण इथे ऊस आणि साखरेची निर्यात होत नाही. सरकारची शेतीबाबत योग्य नीती नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.