AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा शेतकऱ्यांकडे तगादा; …तर थेट डीपीचाच विद्युत पुरवठा केला जातोय खंडित

महावितरणने शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. ज्या डीपीवरील 50 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कर्ज असेल, त्या डीपीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा शेतकऱ्यांकडे तगादा; ...तर थेट डीपीचाच विद्युत पुरवठा केला जातोय खंडित
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 10:04 AM
Share

नंदुरबार – महावितरणने शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. ज्या डीपीवरील 50 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कर्ज असेल, त्या डीपीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका हा ज्या शेतकऱ्यांकडे महावितरणाची थकीबाकी नाही, त्यांना बसताना दिसून येते आहे. पूर्ण डीपीचाच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे त्यांना देखील आपल्या पिकाला पाणी देता येत नाही. महावितरणच्या या धोरणामुळे वीजबिल भरून देखील पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महावितरणने यातून काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

अंधारात राहण्याची वेळ

जिल्ह्यात आता ऊसतोडणी आणि रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाल्याने, अनेक मजूर रात्री शेतातच मुक्कामाला राहातात. मात्र विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्यांच्यावर अंधारात राहाण्याची पाळी आली आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने त्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी देखील दूरवर जावे लागते.  तसेच अंधार असल्यामुळे रात्रीच्यावेळी जंगली श्वापदाच्या हल्ल्याची भीती नाकारता येत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेऊन विद्युत विभागाने सरसकट विद्युत पुरवठा खंडित करू नये. ज्या ग्राहकांनी वीजबिल भरले नाहीत, त्यांचाच वीज पुरवठा खंडित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विद्युत बिल भरण्यास वेळ द्यावा

दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले होते. अति पावसाने पीक खराब झाल्याने शेतकऱ्याला योग्य मोबदला देखील मिळाला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर आता गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने विद्युत बिल वसुलीतून काहीकाळ सूट देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संबंधित बातम्या 

धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!

Nashik| साहित्य संमेलन होणार दणक्यात; पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये

Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.