AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशी होणार, बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले; काय आहे प्रकरण?

गेल्या पाच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता आहे. दिलीप पाटील बँकेत अध्यक्ष असताना नोकर भरती करण्यात आली. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशी होणार, बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले; काय आहे प्रकरण?
| Edited By: | Updated on: Mar 26, 2023 | 12:30 PM
Share

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वपक्षीय सत्ता आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप पाटील बँकेचे अध्यक्ष असताना नोकर भरती, बँकेच्या कारभारात अनियमितता आणि कर्ज वाटपात नियमबाह्यपणा असल्याबाबतची तक्रार करण्यात आली. बँकेचे संचालक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालक मंडळांनी याबाबत महाविकास आघाडीच्या काळात चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर बँकेची चौकशी सुरू झाली होती. मात्र हे चौकशीला पुन्हा राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली.

बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले

राज्याचे सहकारमंत्री अनिल सावे यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती घोटाळा, अनियमित्ता आणि कर्जवाटप या प्रकरणी ही एसआयटी चौकशीची घोषणा विधान परिषदेत केली. एसआयटी चौकशीमुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी केली मागणी

सत्ता बदलानंतर नुकतेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकार मंत्री अनिल सावे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेची पुन्हा चौकशी करा, अशी मागणी केली. यानंतर सहकार विभागाकडून बँकेची पुन्हा चौकशी सुरू झाली. याच चौकशीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सहकारमंत्री अनिल सावे यांनी विधान परिषदेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करण्याची घोषणा केली. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता आहे. दिलीप पाटील बँकेत अध्यक्ष असताना नोकर भरती करण्यात आली. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने ही तक्रार करण्यात आली. महाविकास आघाडीची सत्ता असताना तक्रार करण्यात आली होती. पण, चौकशीवर स्थगिती आली होती. आता सत्ता बदलली. त्यामुळे पुन्हा चौकशी सुरू होईल. यामुळे चौकशीत काय होते, या भीतीने संचालक मंडळ परेशान दिसत आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.