AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशी होणार, बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले; काय आहे प्रकरण?

गेल्या पाच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता आहे. दिलीप पाटील बँकेत अध्यक्ष असताना नोकर भरती करण्यात आली. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशी होणार, बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले; काय आहे प्रकरण?
| Edited By: | Updated on: Mar 26, 2023 | 12:30 PM
Share

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वपक्षीय सत्ता आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप पाटील बँकेचे अध्यक्ष असताना नोकर भरती, बँकेच्या कारभारात अनियमितता आणि कर्ज वाटपात नियमबाह्यपणा असल्याबाबतची तक्रार करण्यात आली. बँकेचे संचालक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालक मंडळांनी याबाबत महाविकास आघाडीच्या काळात चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर बँकेची चौकशी सुरू झाली होती. मात्र हे चौकशीला पुन्हा राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली.

बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले

राज्याचे सहकारमंत्री अनिल सावे यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती घोटाळा, अनियमित्ता आणि कर्जवाटप या प्रकरणी ही एसआयटी चौकशीची घोषणा विधान परिषदेत केली. एसआयटी चौकशीमुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी केली मागणी

सत्ता बदलानंतर नुकतेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकार मंत्री अनिल सावे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेची पुन्हा चौकशी करा, अशी मागणी केली. यानंतर सहकार विभागाकडून बँकेची पुन्हा चौकशी सुरू झाली. याच चौकशीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सहकारमंत्री अनिल सावे यांनी विधान परिषदेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करण्याची घोषणा केली. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता आहे. दिलीप पाटील बँकेत अध्यक्ष असताना नोकर भरती करण्यात आली. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने ही तक्रार करण्यात आली. महाविकास आघाडीची सत्ता असताना तक्रार करण्यात आली होती. पण, चौकशीवर स्थगिती आली होती. आता सत्ता बदलली. त्यामुळे पुन्हा चौकशी सुरू होईल. यामुळे चौकशीत काय होते, या भीतीने संचालक मंडळ परेशान दिसत आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.