AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा संधी होती तेव्हा रस्त्यावर उतरले नाही, दीपक केसरकर यांची या मोठ्या नेत्यावर टीका

राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केवळ केंद्राकडे बोट दाखवून होत नाही.

जेव्हा संधी होती तेव्हा रस्त्यावर उतरले नाही, दीपक केसरकर यांची या मोठ्या नेत्यावर टीका
दीपक केसरकर
| Edited By: | Updated on: Dec 18, 2022 | 4:47 PM
Share

अहमदनगर : शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जेव्हा संधी होती तेव्हा रस्त्यावर उतरले नाही. आता रस्त्यावर उतरत असल्याचं ते म्हणाले. शिवाय केवळ केंद्राकडं बोट दाखवून होत नाही. सत्ता हातात असताना ची चालवून दाखवावी लागते, असा टोलाही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. पण, रस्त्यावर उतरण्याची जेव्हा संधी होती, तेव्हा उतरले नाही. सत्ता होती तोपर्यंत मास्क होता. सत्ता गेली लगेच मास्क उतरला. योग्य वेळी योग्य काम केलं नाही, तर चांगल्या माणसाबद्दल चुकीचा मॅसेज जातो. ठाकरे सरकार असताना महाराष्ट्र ठप्प झाला होता.

आता सत्ता बदलताचं सगळे सण लोकं उत्साहानं साजरे करतात. एखादी अडचण आली तर त्यावर उपाय केला जातो. घरी कोणीच बसलेलं नाही. प्रत्येकाचे व्यवहार सुरू आहेत. कोरोना काळातील देणी आम्ही फेड केली आहे.

राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केवळ केंद्राकडे बोट दाखवून होत नाही. आश्वासनांची पूर्तता आम्ही केलेली आहे. जे वेळेवर कर्ज भरत होते, त्यांना कर्जमाफी दिली. एकावेळी पाच लाख लोकांच्या अकाउंटला पैसे दिले, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.

जी प्रक्रिया दोन-तीन वर्षे चालायची ती एक क्लीकवर आम्ही करत आहोत. अनेक नवीन टेक्नालॉजी आणतोय. समुद्धी महामार्गामुळं पाच तासात नागपूरला आलो. हा चमत्कार महाराष्ट्रात घडतोय. उद्या कोकणला जाण्यासाठीही असाच रस्ता बनणार आहे. त्यासाठी तुमचं राज्य येऊन चालत नाही.

महाराष्ट्राच्या जनतेनं राज्य आणलंय. आम्हाला सुबुद्धी दिली आहे. महाराष्ट्राच्या हिताची काम करायची आहेत. त्यासाठीची शक्ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला असल्याचंही त्यांनी म्हंटलं.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.