नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, धनजंय मुंडेंकडून शेतकऱ्यांना धीर 

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधांवर दाखल झाले. मुंडे यांनी आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ केला.

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, धनजंय मुंडेंकडून शेतकऱ्यांना धीर 
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 4:32 PM

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधांवर दाखल झाले. मुंडे यांनी आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ केला. पालकमंत्र्यांनी पीकविमा कंपनी सह संयुक्त पंचनाम्यांचे निर्देश दिले आहेत. तर, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन देखील धनजंय मुंडे यांनी दिलं आहे.

मराठवाडी गावापासून पाहणीला सुरुवात

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असून आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी मराठवाडी गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.

आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांची पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिकांची शेतांवर जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी जेजुरकर, माजी आमदार साहेबराव दरेकर,तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ. शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश

आता नुकसानीचे पुर्वीप्रमाणे पंचनामे न करता महसुल, कृषी व विमा कंपनीचे असे तीनही अधिकारी यांनी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. त्यानुसार जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकारकडून मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी गंगादेवी येथील तुटलेला रस्ता,सावरगाव येथील छोट्या नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान याचीदेखील पाहणी करून धनंजय मुंडे यांनी गंगादेवी येथील गावकऱ्यांच्या मागणीनुसार रस्त्याच्या पुनर्बांधणी कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

शेतकऱ्यांनी व्यथा धनंजय मुंडेंसमोर मांडल्या

आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथून धनजंय मुंडे यांच्या दौऱ्यास सुरुवात झाली असून शेडळा, सावरगाव याठिकाणच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पालकमंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. यानंतर गेवराई तालुक्यातील गंगावाडी, तलवाडा, रामनगर, राजरी मळा, या ठिकाणी पाहणी करणार आहेत. शेतीतील खरीप पिकांचे आणि फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. असं आश्वासन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या असून पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर बातम्या:

‘महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?’

‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’, व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अण्णा हजारेंना चिमटा

Dhananjay Munde visit heavy rainfall affected areas of Beed district assures farmers compensation will given to farmers

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.