AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस पडावं म्हणून असं काही केलं की गावात चर्चा जोरात

गाढव सजवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. या गाढवाच्या लग्नाची अनोख्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरू आहे.

पाऊस पडावं म्हणून असं काही केलं की गावात चर्चा जोरात
| Updated on: Jul 02, 2023 | 9:51 PM
Share

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात अद्यापपर्यंत बळीराजांनी म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. पाऊस न पडल्याने बळीराजा हवालदिल झाला. पाऊस पडावा म्हणून बळीराजा देवालाही साकडं घालत असतो. जून महिना संपला तरी पेरणी योग्य पाऊस पडला नाही. मुरूम शहरातील शेतकऱ्यांनी या नक्षत्राचे वाहन असलेल्या गाढवाचे लग्न निसर्गाबरोबर लावून दिले. गाढव सजवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. या गाढवाच्या लग्नाची अनोख्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरू आहे.

चक्क गाढवाचेच लगीन लावून दिले आहे. गाढवांना नवरदेवाप्रमाणे सजवून त्यांच्या गळ्यात हार घालत वाजत गाजत त्यांची गावभर मिरवणूक काढली. मोठ्या थाटामाटात गाढवाचं लग्न लावून देण्यात आले. हे वरूण राजाला साकडं घालण्यासाठीच गाढवाचे लग्न लावल्याचं गावकरी सांगत आहेत.

अशी आहे लोकांची धारणा

वेळेत पाऊस नाही झाला किंवा पेरण्यानंतर दीर्घ ओढ दिल्यास आणि ठिकाणी ज्या त्या वेळेतील नक्षत्राच्या वाहनांची कार्यक्रम घेतली जातात. अगदी बेडकाचीही लग्न लावले जाते. देवाला पाण्यात ठेवणे गाढवाचे लग्न गाढवाची मिरवणूक काढण्यात आले. पाऊस पडतो अशीही धारणा ग्रामीण भागात प्रचलित असल्याने यातूनच मुरूम शहरात गाढवाचे लग्न लावण्यात आले.

धोंडी मागून वरूण राजाला साकडे

पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी संपला तरी वाशिम जिल्ह्यात कुठेही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील खरिपातील ८० टक्के पेरण्या रखडल्या. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामस्थांनी धोंडी मागुन वरूण राजाला साकडे घातले आहे.

जुन्या रुढी परंपरांचे पालन

यावेळी जुन्या रूढी परंपराना उजाळा देत गावातील नागरिकांनी कमरेला लिंबाचे डहाळे बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे दे दाय दाणा पिकु दे’ अशा स्वरूपात वरूण राजाकडे पावसाचे साकडे घालण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही ग्रामीण भागात पावसाला प्रसन्न करण्यासाठी जुन्या रूढी परंपराचे पालन केल्या जात आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....