AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनचा फटका, नवी मुंबई मार्केटमध्ये भाजीपाला पडून, भाजीपाल्याच्या दरात 50 टक्क्यांनी घसरण

राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल केल्यांनतर मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मालाला चांगला उठाव मिळाला होता. पण पुन्हा निर्बंध लादल्याने भाज्यांच्या दरात घसरण पाहायला मिळतीय. (Falling prices Vegetables in navi mumbai APMC)

लॉकडाऊनचा फटका, नवी मुंबई मार्केटमध्ये भाजीपाला पडून, भाजीपाल्याच्या दरात 50 टक्क्यांनी घसरण
भाज्यांच्या दरात घसरण...
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 02, 2021 | 1:57 PM
Share

नवी मुंबई : राज्यात सरकारने पुन्हा टाळेबंदी नियमावली बदलल्याचा परिणाम मुंबई एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र तिसऱ्या स्तराचे नियम लागू करण्यात आले असून फेरीवाले तसेच किरकोळ भाजीपाला विक्रीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच मुभा देण्यात आली आहे. किरकोळ विक्रेते भाजीपाला घेऊन आपल्या जागेवर जाईपर्यंत विक्रीची वेळ निघून जात असल्याने त्यांचा माल शिल्लक राहतो. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी मार्केटला फिरकत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. ग्राहक नसल्याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय शनिवार, रविवार दोन दिवस कडक टाळेबंदी असल्याने आज भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल पडून असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय काही भाज्यांच्या दरात थेट 50 टक्के घसरण झाली. (Falling prices Vegetables in navi mumbai APMC )

भाजीपाल्याच्या दरात घसरण

राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल केल्यांनतर मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मालाला चांगला उठाव मिळाला होता. तर काही भाज्या प्रतिकिलो 50 रुपयांहून अधिक विकल्या जात होत्या. मात्र, नवीन नियमावलीचा फटका भाजीपाला व्यापाराला बसला आहे. तर भाजीपाल्याचा दरात घसरण झाली असून 30 टक्के माल विक्रिविना शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.

एपीएमसी मार्केटमधील व्यापार पूर्णतः थंडावला

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज 530 गाड्या आवक झाली आहे. परंतु भाज्यांना उठाव नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. तर अचानक उतरलेले भाजारभावाने शेतकऱ्यांसह व्यापारी हवालदिल झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मुंबई एपीएमसी मार्केटमधील व्यापार पूर्णतः थंडावल्याचे भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच किरकोळवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने मुंबई आणि उपनगरात ह्याच भाजीपाला किरकोळ मध्ये 50 ते 100 रुपये किलोने विक्री केला जात आहे.

भाजीपाल्याचा दर किती?

सद्यस्थितीत मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भेंडी 10 रुपये, वांगी 12 रुपये, काकडी 10 रुपये, मिरची 24 रुपये, शिमला मिरची 16 रुपये, दुधी 20 रुपये, कारली 36, पडवळ 18 रुपये, फ्लावर 14, मेथी जुडी 10 ते 12 रुपये, पालक जुडी 5 ते 7 रुपये तर कोथिंबीर जुडी 10 रुपये विकली जात आहे.

(Falling prices Vegetables in navi mumbai APMC)

हे ही वाचा :

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले, तुमच्या खात्यात 2 हजार पोहोचले का?

Maharashtra Krishi Diwas 2021: काँग्रेसचे असे मुख्यमंत्री, ज्यांनी शिवसेनेच्या वाघाला बळ दिलं, जे ‘स्वावलंबनासाठी’ फाशी जाईन म्हणाले!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...