AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसा अभावी शेतातलं पीक सुकू लागलं, कर्ज कसं फेडणार? भंडाऱ्यात चिंतेनं शेतकऱ्याची आत्महत्या

शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्यानं कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना झाल्यात. मात्र, पेरणीच्या सुरुवातीलाच पीक येण्याची शक्यता दिसत नसल्याने एका शेतकऱ्यानं भरदिवसा गळफास घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

पावसा अभावी शेतातलं पीक सुकू लागलं, कर्ज कसं फेडणार? भंडाऱ्यात चिंतेनं शेतकऱ्याची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 4:39 PM
Share

भंडारा : शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्यानं कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना झाल्यात. मात्र, पेरणीच्या सुरुवातीलाच पीक येण्याची शक्यता दिसत नसल्याने एका शेतकऱ्यानं भरदिवसा गळफास घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात तावशी येथे ही घटना घडली. अशोक सिताराम वालदे (वय 62 वर्ष, रा. तावशी) असं आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

या शेतकऱ्यानं यंदाच्या खरीप हंगामात विविध प्रकारे कर्ज घेऊन शेतात विविध पिकांची लागवड केली. मात्र, गत काही दिवसांपासून पावसा अभावी शेतातलं पिक नष्ट झालं. यामुळे आता कर्ज कसं फेडावं या भीतीनं तणावात आलेल्या 62 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्ज कसं फेडावं या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या

मृत शेतकऱ्याची गावात एक एकर आणि अतिक्रमणातील 1 एकर अशी एकूण 2 एकर शेतजमीन आहे. यंदाच्या खरिपात या शेतजमिनीत विविध पीक लागवडीसाठी या शेतकऱ्यांनं पीक कर्जाची उचल केली. मात्र, गत काही दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत नसल्यानं पिक पावसा अभावी सुकू लागल्यानं कर्ज कसं फेडावं या चिंतेत शेतकरी होता.

दरम्यान, स्वमालकीच्या घरासमोर जांभळीच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्यानं घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना होताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा :

‘एक गाव ज्याचं शेतकरी आत्महत्याग्रस्त असं नाव’, आतापर्यंत 30 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली

गेल्या 3 वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी जीवन संपवलं? केंद्रीय कृषीमंत्री काय म्हणाले?

बळीराजाचे पैसे परस्पर लाटले, कर्ज फेडण्यासाठी तगादा; शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

व्हिडीओ पाहा :

Farmer suicide in Bhandara due to crop loss

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.