AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडनदी धरण तुडुंब भरले, नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

धरणातील सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे. (Gadanadi dam at Sangameshwar filled to full capacity)

गडनदी धरण तुडुंब भरले, नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
Gadnadi dam
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 11:36 AM
Share

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून गडनदी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे गडनदी धरणातून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नदी किनारी गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Gadanadi dam at Sangameshwar filled to full capacity riverside villages warned of danger)

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. या धरणात क्षमता पूर्ण पाणीसाठा झाला आहे. या धरणातील सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे. तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना

सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 11 जूनला सकाळी 11 पर्यंत या ठिकाणी एकूण 50 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. तर आतापर्यंत या भागात 575 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गडनदी धरण पाहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरु नये. तसेच सांडव्याच्या पाणी प्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही उपविभागीय अभियंता संजय सोनावणे यांनी केल्या आहेत.

तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरु नये. स्वत: सह जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही राजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी केले आहे.

गडनदी धरणाची थोडक्यात माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 126.15 मीटर इतकी आहे. सध्या त्याची पाणी पातळी ही 121.20  एवढी आहे. त्याशिवाय आता त्यातून 41.092 घ.मी./ सेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या धरणात एकूण 64.88 दल.घ.मी पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा 64.56 दलघमी एवढा आहे. (Gadanadi dam at Sangameshwar filled to full capacity riverside villages warned of danger)

संबंधित बातम्या :

माथेरानमधील 10 फुटीर नगरसेवकांचा राजकीय एन्काऊंटर, शिवसेनेचा भाजपला धक्का

कोरोनामुळे घर खरेदीचा पॅटर्न बदलला, शहराबाहेर घर खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती

पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण, अहमदनगरमध्ये गुन्हा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.