AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : शेती गेली, जनावरं मेली, तात्काळ मदत द्या… शेतकऱ्यांनी केली मागणी, गिरीश महाजन म्हणाले मी पैसे घेऊन आलो नाही

Girish Mahajan : सध्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले. त्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने संताप व्यक्त होत आहे.

Girish Mahajan : शेती गेली, जनावरं मेली, तात्काळ मदत द्या... शेतकऱ्यांनी केली मागणी, गिरीश महाजन म्हणाले मी पैसे घेऊन आलो नाही
गिरीश महाजन
| Updated on: Sep 24, 2025 | 1:33 PM
Share

अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने मराठवाडा, विदर्भातील नागरिक हैराण झाले आहेत. मुसळधार पावसाने अनेक गावांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. तर आजपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. ते नुकसानीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांचं घरं, पीकं आणि जनावराचं मोठं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)काल धाराशिव दौऱ्यावर होते. त्यावेळी महाजन उशीरा पाहण्यासाठी आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर यंत्रणा पंचनामे करत नसल्याने पण शेतकरी संतप्त आहेत. त्यात काही शेतकऱ्यांनी महाजनांचा ताफा अडवला. त्यातच महाजन यांच्या एका वक्तव्यावरून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

मी पैसे घेऊन आलो नाही

धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांचे शेकडो जनावरं वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडून धरला. गिरीश महाजन आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. जनावर मेली आहेत तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो, मी पैसे घेऊन आलो नाही असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. महाजन यांच्या असंवेदनशीलतेवर विरोधकांनी टीका केली. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे निघाले.

संकट मोचक तरी व्हा

मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. तुम्ही जसे भाजप सरकारचे संकट मोचक झालात तसं शेतकऱ्याचं का होत येत नाही, असा सवाल कडू यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी बोलताना विचारला. किमान चांगलं बोलता येत नसेल तर जावू नका न कोणी आग्रह केला, असा सवाल त्यांनी केला. देत तर काहीच नाही उलटून अशी भाषा करत असेल तर निषेध करतो असे बच्चू कडू म्हणाले.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.