AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं झालं की, मंत्रिमंडळ विस्तार होतो, अब्दुल सत्तार यांनी सांगितलं

मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे.

असं झालं की, मंत्रिमंडळ विस्तार होतो, अब्दुल सत्तार यांनी सांगितलं
अब्दुल सत्तार यांनी सांगितलंImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 28, 2022 | 6:09 AM
Share

परभणी : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार यावर चर्चा होतेय. यासंदर्भात कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ज्या क्षणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोन येईल त्याच क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मी चार वेळा मंत्री झालेलो आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन आला की मंत्रिमंडळ विस्तार होतो. अब्दुल सत्तार यांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अब्दुल सत्तार आज परभणीत होते. शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

या सरकारमध्ये सगळं वेल अँड गुड आहे. मोठा परिवार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टी होत असतात. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सरकारला अजिबात धोका नाही. शिवाय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. पुढचे दोन वर्षे हेच मुख्यमंत्री राहतील. माझी तर इच्छा आहे की पुढेही हेच मुख्यमंत्री असावेत, असंही सत्तार म्हणाले.

शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसासाठी दैवत आहे. मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे. माझ्या हातात हे जर राहिलं असतं तर मी लगेच ऑर्डर काढली असती, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

सचिन सावंत यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करू नये. या छोट्या-मोठ्या गोष्टी चालत राहतात. मजाकमध्ये म्हणलेली गोष्ट आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांना मी वैयक्तिक पाहिलेला आहे. त्यांचं काम उत्तम आहे. काही लोकांना कामच राहिलं नाही. त्यामुळं ते अशा गोष्टी समोर आणतात.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी अब्दुल सत्तार यांचं मंत्रीपद काढून त्यांना बिन खात्याचे मंत्री करावं, असं म्हटलं. यावर अमोल काय एवढा मोठा नाही की आपण इतक्या लोकांत त्याची चर्चा करावी. कोणाला टीव्हीवर येण्यासाठी काही बोलावे लागते, त्याचाच हा एक भाग आहे. राहिला विषय अमोल याच्याबद्दल काय बोलायचं हे मला माहीत आहे. मात्र हे बोलणं उचित होणार नाही. नाहीतर मला कोणाचं काय करायचं हे चांगलं माहीत आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.