350 वा शिवराज्याभिषेक सोहळा वादाच्या भोवऱ्यात? शिवराज्याभिषेकाचं हे 349 वे वर्ष? इतिहास अभ्यासकाचे सरकारवर ताशेरे

शिवराज्याभिषेकाचं हे 349 वं वर्ष आहे, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला. पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? असा सवाल त्यांनी केलाय.

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा वादाच्या भोवऱ्यात? शिवराज्याभिषेकाचं हे 349 वे वर्ष? इतिहास अभ्यासकाचे सरकारवर ताशेरे
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 3:07 PM

कोल्हापूर : किल्ले रायगडावर आज दिमाखदार सोहळा पार पडला. कारण आजच्याच दिवशी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला आज तिथीनुसार 350 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. पण हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण काही जणांनी तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्याचं यावर्षी 350 वं वर्ष नाही तर 349 वं वर्ष आहे, असा दावा इंद्रजीत सावंत यांनी केलाय.

शिवराज्याभिषेकाचं हे 349 वं वर्ष आहे, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला. पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? असा सवाल इंद्रजीत सावंत यांनी केला. तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जातातच कसे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवराज्याभिषेकाचा संबंध काय? अशा शब्दांत इंद्रजीत सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

इंद्रजीत सावंत नेमकं काय म्हणाले?

“6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकचा 300 वा महोत्सव तत्कालीन राज्य सरकारने जून 1974 ला साजरा केला. यशवंतराव चव्हाण तत्कालीन अर्थमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रायगडावर जाऊन होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या लोकराज्य या अधिकृत मुखपत्रातही तसा उल्लेख आहे. 350 शिवराज्याभिषेक सोहळा 2024 ला आला पाहिजे”, असं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘एक वर्ष कुणी खाल्लं?’

“यामागे राजकीय भावना आहेत का? हा राजकीय इव्हेंट करायचा होता का? तिथीनुसार झालेल्या राज्याभिषेकाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जातातच कसे? एक वर्ष कुणी खाल्लं? यावर अभ्यास झाला पाहिजे. शिवराज्याभिषेक आणि सावरकरांचा संबंध काय? चांदीची पालखी सावरकर स्मारकाजवळ लिहून बाहेर आणली. शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या बद्दलची नाटकं सांगणं,पालखी नेणं किती योग्य?”, असा सवाल त्यांनी केला.

“मंडप घालताना पुरातत्त्व शास्त्राचा अभ्यास देखील केला नाही. गोल्स कार देखील नेली गेली. चालण्याची क्षमता देखील या राजकीय नेत्यांकडे राहिली नाही का? पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. हा ईव्हेंट करता येणार नाही म्हणून हे सगळं केलं गेलं का? हा प्रश्न आहे”, असं मत सावंत यांनी मांडलं.

समुद्रातल्या शिवस्मारकाची काय अवस्था आहे? तुम्ही पाहत आहात. प्राधिकरणाची घोषणा करायची पण पैसे कोण देणार? प्राधिकरणाला अधिकार काय असतील? पैसे आणि अधिकार देखील द्यावेत. फक्त हवेतल्या घोषणा सरकारने करू नयेत, अशा शब्दांत इंद्रजीत सावंत यांनी सुनावलं.

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.