AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! अमल महाडिक यांचं चॅलेंज सतेज पाटील यांनी स्वीकारलं, कोल्हापुरात दोन्ही गट आमनेसामने

कोल्हापुरातील राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिंदू चौकात घडामोडींना वेग आलाय. कारण कोल्हापुरातील बिंदू चौकात आता महाडिक आणि पाटील गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. महाडिक गटाचं चॅलेंज सतेज पाटील यांच्या गटाने स्वीकारलं आहे. त्यामुळे बिंदू चौकात नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वात मोठी बातमी! अमल महाडिक यांचं चॅलेंज सतेज पाटील यांनी स्वीकारलं, कोल्हापुरात दोन्ही गट आमनेसामने
| Edited By: | Updated on: Apr 14, 2023 | 7:38 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवरुन आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि महाडिक गट यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसत आहे. विशेष म्हणजे आता आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट बिंदू चौकात आमनेसामने येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष आता बिंदू चौकाकडे लागलं आहे. माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलंय. तेच आव्हान सतेज पाटील यांच्या गटाने स्वीकारलं आहे. त्यामुळे आता आज संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात महाडिक आणि सतेज पाटील गट आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार ऋतुराज पाटील वाजत गाजत संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात येणार आहेत. खरंतर राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून महाडिक आणि पाटील गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. असं असताना आता दोन्ही गट आमनेसामने येऊन चर्चा करणार आहेत.

सतेज पाटील व्यासपीठावरून म्हणाले, ‘भ्याले…भ्याले… महाडिक भ्याले’

या सगळ्या घडामोडींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांच्यामध्ये चांगलंच शीतयुद्ध सुरू झालेलं आहे. काल एका सभेमध्ये सतेज पाटील यांनी व्यासपीठावरून भ्याले…भ्याले… महाडिक भ्याले असं म्हणत त्यांना खुले आव्हान दिलं होतं.

सतेज पाटील यांनी दिलेल्या या आव्हानाचा स्विकार करत श्री राजाराम साखर कारखान्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन मी आज संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्ही देखील डी वाय पाटील साखर कारखान्याची कागदपत्र घेऊन बिंदू चौकात यावं, असं प्रति आव्हान माजी आमदार अमल महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना दिलं आहे. आता अमल महाडिक यांच्या आव्हानाला सतेज पाटील काय उत्तर देतात याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे.

खरंच आमनेसामने चर्चा होणार?

महाडिक गट आणि पाटील गट यांच्यातील वाद हा नवा विषय नाही. कोल्हापुरात नेहमी वेगवेगळ्या कारणास्तव दोन्ही गटांमधील संघर्ष उफाळून बाहेर येत असतो. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात असतात. आता दोन्ही गट बिंदू चौकात एकत्र येत असल्याने परिसरात तणाव निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे बिंदू चौकात पोलिसांकडून सुरक्षेची काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीसही अलर्ट असतील. त्यामुळे महाडिक आणि पाटील गटात उघडपणे आणि आमनेसामने कितपत चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.