लेकाच्या लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत 22 जोडप्यांचा विवाह, लातूरमध्ये अनोख्या सोहळ्याची चर्चा
लातूर मध्ये एक अविस्मरणीय विवाह सोहळा पार पडलाय. एका पित्याने आपल्या मुलाच्या लग्नावरील अनावश्यक खर्च टाळत चक्क 22 जोडप्यांचे विवाह स्वखर्चाने लावून दिले आहेत.
लातूर : लातूर मध्ये एक अविस्मरणीय विवाह सोहळा पार पडलाय. एका पित्याने आपल्या मुलाच्या लग्नावरील अनावश्यक खर्च टाळत चक्क 22 जोडप्यांचे विवाह स्वखर्चाने लावून दिले आहेत.एव्हढेच नाही तर या नवविवाहिताना संसार उपयोगी साहित्यही भेट म्हणून दिले आहे.या विवाहाची सध्या लातूरमध्ये चर्चा आहे.
हे आहेत लातुरचे सामाजिक कार्यकर्ते सरफराज मणियार, सरफराज यांच्या मुलाचा विवाह ठरला, त्यावेळीच त्यांनी आपल्या मुलाच्या विवाह सभारंभा वरील अनावश्यक खर्च टाळून चांगला उपक्रम राबवायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी मुस्लिम समाजातल्या 22 जोडप्यांचे विवाह स्वखर्चाने लावून दिले आहेत.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विवाह सोहळ्याचं आयोजन
या सामूहिक विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च सरफराज मणियार यांनी केला आहे. मणियार हे शेतकरी आणि बांधकाम व्यवसायिक आहेत ,सामाजिक बांधिलकीने ते अनेक उपक्रम राबवत असतात.आपल्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने त्यांनी या 22 जोडप्यांच्या विवाहाचा राबवलेला उपक्रम देखील कौतुकास्पद आहे.
रिसेप्शनचा खर्च टाळून विवाह सोहळा
सरफराज मणियार यांनी त्यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून 22 जोडप्यांचं लग्न लावून दिलं आहे. गरीब असो की श्रीमंत असो मुस्लीम धर्मात साधारणपणानं लग्न लावावं असं सांगितलं जातं. गरीब, असो मध्यमवर्गीय लोकं आमच्याकडं आली त्यांची लग्न लावून दिली आहेत. जिल्ह्याबाहेरील लोक देखील सामुदायकि विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. अनावश्यक खर्च टाळून हा कार्यक्रम राबवण्यात आला. मुलानं सांगितल्याप्रमाणेच सामुदायिक विवाह सोहळा राबवल्याचं सरफराज मणियार यांनी सांगितलंय.
इतर बातम्या:
मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय, बाळा नांदगावकर यांचं सनसनाटी पत्र
Latur Sarfraj Maniyar organized collective marriage of 22 couples