AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेता कितीही चांगला असो कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर ‘कार्यक्रम’ होतोच; गुलाबराव पाटील यांच्या कानपिचक्या

राजकारणामध्ये खेळ जसा समोर येतो तसा खेळ खेळावा लागतो. सध्या राजकारणात खेळ सावल्यांचा चालला आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे.

नेता कितीही चांगला असो कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर 'कार्यक्रम' होतोच; गुलाबराव पाटील यांच्या कानपिचक्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 8:18 AM

जळगाव: राजकारणात नेत्यांची सर्व मदार ही कार्यकर्त्यांवर असते. कार्यकर्ते मेहनती असेल तर नेता मोठा होण्यास वेळ लागत नाही. पण नेता मोठा असेल, तो कितीही चांगला असेल, पण त्याचे कार्यकर्ते चांगले नसतील तर नेत्यांना अडचणी होतातच. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेता आणि कार्यकर्त्यांच्या नेमक्या याच संबंधावर बोट ठेवून कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. नेता कितीही चांगला असला पण कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर नेत्याचा कार्यक्रम होतोच, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आपण निवडणुकीत पडल्यानंतर कसे सुधारलो याचा किस्साही त्यांनी ऐकवला.

नेता चांगला असेल मात्र त्याचे काही कार्यकर्ते अडचणी निर्माण करत असतील तर मोठा कार्यक्रम होऊन जातो. मी ज्यावेळी चार हजार मतांनी पडलो त्याचे मूळ कारण माझे काही कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी जो उन्माद केला, त्यामुळे मी पराभूत झालो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गुलाबराव पाटील चांगला आहे. मात्र त्यांना निवडून दिल्यास कार्यकर्ते उन्माद करतील असं मतदारांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मला पाडलं. त्या निवडणुकीत मी 4 हजार मतांनी पडलो. त्यामुळे नेत्यासोबत कार्यकर्ते देखील चांगले असले तर नेता पुढे जातो, असं ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सिडेंट हो जायेगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

गाडीचा वेग जर जास्त झाला तर त्यासाठी ब्रेकरची गरज असते. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडीबरोबर चालवतो, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.

राजकारणामध्ये खेळ जसा समोर येतो तसा खेळ खेळावा लागतो. सध्या राजकारणात खेळ सावल्यांचा चालला आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळेच गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे हा हल्ला चढवला.

पैशाने सर्व साध्य झालं असतं तर या देशाचे पंतप्रधान टाटा बिर्ला झाले असते. नरेंद्र मोदी राहिले नसते, असंही त्यांनी सांगितलं. जो काम करतो जनता त्याच्या मागे राहते. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. पैशाने सर्व साध्य होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं

ज्योती मल्होत्रा फॉरेन्सिक तपासणीत अडकली
ज्योती मल्होत्रा फॉरेन्सिक तपासणीत अडकली.
कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी,भुजबळांना कोणत खातं हवं?पहिली प्रतिक्रिया काय?
कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी,भुजबळांना कोणत खातं हवं?पहिली प्रतिक्रिया काय?.
वाह फडणवीस...असा काय नाईलाज...भुजबळांच्या शपथविधीवरून दमानियांचा संताप
वाह फडणवीस...असा काय नाईलाज...भुजबळांच्या शपथविधीवरून दमानियांचा संताप.
तात्पुरत नादी लावलंय, भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच जरांगेंचा संताप
तात्पुरत नादी लावलंय, भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच जरांगेंचा संताप.
छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, मंत्रिपदाची अशी घेतली शपथ
छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, मंत्रिपदाची अशी घेतली शपथ.
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन.
वक्त की बात...आज तेरा... शपथ घेण्याआधीच भुजबळांचा जुना व्हिडीओ व्हायरल
वक्त की बात...आज तेरा... शपथ घेण्याआधीच भुजबळांचा जुना व्हिडीओ व्हायरल.
भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक, नाराजी दूर? अशी आहे राजकीय कारकिर्द
भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक, नाराजी दूर? अशी आहे राजकीय कारकिर्द.
शेवट चांगला... मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी छगन भुजबळ काय म्हणाले?
शेवट चांगला... मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी छगन भुजबळ काय म्हणाले?.
पाकमध्ये ऑपरेशन अज्ञातची चर्चा, वाँटेड अतिरेक्यांचा खात्मा करणारे कोण?
पाकमध्ये ऑपरेशन अज्ञातची चर्चा, वाँटेड अतिरेक्यांचा खात्मा करणारे कोण?.