AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेता कितीही चांगला असो कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर ‘कार्यक्रम’ होतोच; गुलाबराव पाटील यांच्या कानपिचक्या

राजकारणामध्ये खेळ जसा समोर येतो तसा खेळ खेळावा लागतो. सध्या राजकारणात खेळ सावल्यांचा चालला आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे.

नेता कितीही चांगला असो कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर 'कार्यक्रम' होतोच; गुलाबराव पाटील यांच्या कानपिचक्या
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 04, 2023 | 8:18 AM
Share

जळगाव: राजकारणात नेत्यांची सर्व मदार ही कार्यकर्त्यांवर असते. कार्यकर्ते मेहनती असेल तर नेता मोठा होण्यास वेळ लागत नाही. पण नेता मोठा असेल, तो कितीही चांगला असेल, पण त्याचे कार्यकर्ते चांगले नसतील तर नेत्यांना अडचणी होतातच. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेता आणि कार्यकर्त्यांच्या नेमक्या याच संबंधावर बोट ठेवून कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. नेता कितीही चांगला असला पण कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर नेत्याचा कार्यक्रम होतोच, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आपण निवडणुकीत पडल्यानंतर कसे सुधारलो याचा किस्साही त्यांनी ऐकवला.

नेता चांगला असेल मात्र त्याचे काही कार्यकर्ते अडचणी निर्माण करत असतील तर मोठा कार्यक्रम होऊन जातो. मी ज्यावेळी चार हजार मतांनी पडलो त्याचे मूळ कारण माझे काही कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी जो उन्माद केला, त्यामुळे मी पराभूत झालो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील चांगला आहे. मात्र त्यांना निवडून दिल्यास कार्यकर्ते उन्माद करतील असं मतदारांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मला पाडलं. त्या निवडणुकीत मी 4 हजार मतांनी पडलो. त्यामुळे नेत्यासोबत कार्यकर्ते देखील चांगले असले तर नेता पुढे जातो, असं ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सिडेंट हो जायेगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

गाडीचा वेग जर जास्त झाला तर त्यासाठी ब्रेकरची गरज असते. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडीबरोबर चालवतो, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.

राजकारणामध्ये खेळ जसा समोर येतो तसा खेळ खेळावा लागतो. सध्या राजकारणात खेळ सावल्यांचा चालला आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळेच गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे हा हल्ला चढवला.

पैशाने सर्व साध्य झालं असतं तर या देशाचे पंतप्रधान टाटा बिर्ला झाले असते. नरेंद्र मोदी राहिले नसते, असंही त्यांनी सांगितलं. जो काम करतो जनता त्याच्या मागे राहते. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. पैशाने सर्व साध्य होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक