AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवभोजन केंद्राचं अनुदान 5 महिन्यांपासून अडकलं; ठाकरे सरकारची महत्त्वाची योजना बंद पडण्याच्या दिशेनं

राज्यातील शिवभोजन केंद्र (Shivbhojan Kendra) संचालक अडचणीत आले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडलं असल्याचं समोर आलंय.

शिवभोजन केंद्राचं अनुदान 5 महिन्यांपासून अडकलं; ठाकरे सरकारची महत्त्वाची योजना बंद पडण्याच्या दिशेनं
शिवभोजन केंद्र
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 19, 2021 | 2:05 PM
Share

चंद्रपूर: राज्यातील शिवभोजन केंद्र (Shivbhojan Kendra) संचालक अडचणीत आले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडलं असल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडी सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते.मात्र, हळूहळू यातील अनुदान बंद होत गेल्याने संचालकांनी केंद्र सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोलताना राज्यात सरकार आहे का?असा प्रश्न विचारला आहे.

शिवभोजन केंद्र बंद पडल्यास गरीब-गरजू नागरिकांची अडचण

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत. गाजावाजा करून सुरू केलेली ही योजना अनुदान मिळत नसल्याने सुरू ठेवण्यास केंद्र संचालकांनी असमर्थता दर्शविली आहे. तातडीने यावर उपाय न शोधल्यास गरीब-गरजू नागरिकांची अडचण होणार आहे.

पाच महिन्यांपासून अनुदान रखडलं

राज्यातील शिवभोजन केंद्र संचालक सध्या अडचणीत सापडले आहेत. गेले पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले आहे. चंद्रपूरसह राज्यभरात हीच स्थिती आहे. सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे आहे. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते. मात्र आधी 15 दिवसानी मिळणारे अनुदान नंतर महिना 5 महिन्यावर गेले आहे.

शिवभोजन योजना बंद पडणार होती

ही योजना बंदच पडणार होती. कारण शेतकरी- विद्यार्थी आणि राज्यातील सर्वच घटकांना या सरकारने कुठलाही दिलासा दिलेला नाही. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर टीका करताना राज्यात सरकार आहे का?असा प्रश्न विचारला आहे.

आधीच कोरोना काळात राज्यातील जनतेचे आर्थिक गणित बिघडले आहे. हजारो हातांना काम उरलेले नाही. त्यातच गरीब गरजू घटकांना आवश्यक असलेली ही योजना बंद झाल्यास मोठे संकट ओढवणार आहे.

इतर बातम्या:

Eknath Khadse : गुलाबराव पाटलांनी 30 वर्षांचा हिशोब काढला, 40 वर्षात एकदाही हरलो नाही, एकनाथ खडसेंनी दाखवला आरसा

Nagpur Congress | पालकमंत्र्यांनीच काढले महागाईविरोधात पदयात्रा; नितीन राऊत यांची केंद्रावर टीका

MVA Government Shivbhojan Kendra owners facing problems due to not get subsidy from government

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक